अंगणवाड्यांचे समूह एकत्रित करून त्यांच्या पालकांना मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र करण्यात येते. या मेळाव्याच्या माध्यमातून मुलांच्या विकासात सुधारणा, कुटुंब आणि समुदाय सशक्त करणे, बाल संगोपनाबद्दल समुदाय जागरूकता वाढवणे, अंगणवाडी आणि आशा ताईंची भूमिका अधिक बळकट करणे, समग्र बालकांच्या काळजीबाबत दृष्टीकोन तयार करणे, समुदायाचा सहभाग आणि आत्मविश्वास वाढविणे, सातत्याने टिकणाऱ्या बालकांच्या पद्धतींचा प्रसार करण्याचे काम करण्यात येते.
या मेळाव्यात दोन वर्षे वयोगटापर्यंत मुलांसाठी वयोगटानुसार खेळणी आणि शैक्षणिक साहित्य दाखवले जाते, दोऱ्यांचे जुने पुंजके, साबणाचे बॉक्स, कागदी डबे या वापरलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या खेळांच्या माध्यमातून मुलांच्या पाचही इंद्रियांचा विकास करणे हा उद्देश होय. दोऱ्यांचे वापरलेले रिळ, टाकून दिलेली झाकणे, पुठ्ठा, बांगड्या, साबणाचे रिकामे कागदी डब्बे यापासून बनवलेली तोरणं, माळा, रंगीत खेळणी मुलांना मेळाव्यात खिळवून ठेवतात. खेळणाऱ्या मुलांबरोबर त्यांची आई आणि इतर पालकांचाही समावेश होतो. काही खेळ हे पालकांसाठी असतात.
No comments:
Post a Comment