Wednesday, 19 November 2025

शासनाच्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा व ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम

 शासनाच्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा व ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या उपाययोजनांचा जिल्ह्यातील आरटीएस सेवा वेळेवर वितरित करण्यावर सकारात्मक परिणाम झाला असून एप्रिल 2025 मध्ये 59.48 टक्के असलेले हे प्रमाण आता ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढून 90.28 टक्क्यांवर गेले आहे. प्रशासकीय पातळीवर हे प्रमाण 100 टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

नवीन सेतू सुविधा केंद्रे डिजिटल क्यू मॅनेजमेंटटोकन प्रणालीरियल-टाइम स्टेटस डिस्प्ले आणि आरामदायक वेटिंग एरिया अशा अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असूननागरिकांचा वेळ वाचवणे आणि सेवा प्रक्रिया सुलभ करणे हे या केंद्रांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासोबतचजिल्ह्यात फिरते सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असूनत्याद्वारे नागरिकांना घराजवळ किंवा घरपोच सेवा अर्ज करता येणार आहेत. नागरिकांना सेतू कार्यालयात एकदाच अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर पुन्हा दाखला घेण्यासाठी येण्याची गरज पडू नयेनागरिकांचा वेळ वाचावा आणि घरबसल्या व्हॉटस्ॲप वर दाखला मिळावा यासाठी आपले सरकार आपला दाखला थेट आपल्या हातात’ असा व्हॉटस्ॲप सर्विस डिलिव्हरी उपक्रम राबविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेवांविषयीची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी व्हॉटस्ॲप चॅटबॉट सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आली असून 238 नवीन आपले सरकार सेवा केंद्रही कार्यान्वित झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi