मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही स्पर्धा पुण्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारी ठरेल. देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना लागायचा. पुण्यात १९४७ साली पहिली सायकल स्पर्धा झाली होती. त्यामुळे पुण्याची ओळख ‘सायकलचे शहर’ म्हणून होती, आणि ही सायकल संस्कृती आजही शहराच्या अभिमानाचा भाग आहे. जागतिक वेळापत्रकात या स्पर्धेचा समावेश झाल्याने तिचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल आणि ही स्पर्धा देशासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्याच्या ७७ वर्षीय सायकलपटू निरुपमा भावे, प्रीती म्हस्के, अहिल्यानगरच्या प्रणिती सोमण, छत्रपती संभाजीनगरचे भारत सोनवणे, जळगावचे आकाश म्हेत्रे आणि सोलापूरच्या पूजा दानोळे यांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment