Saturday, 4 October 2025

सेवा प्रवेश नियमांत सुधारणा आणि अनुकंपा तत्त्वाला न्याय

 सेवा प्रवेश नियमांत सुधारणा आणि अनुकंपा तत्त्वाला न्याय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीअनेक विभागांचे सेवा प्रवेश नियम ५० वर्षे जुने होते. तंत्रज्ञानातील बदलांमुळे अगदी लिपिकापासून ते वरच्या स्तरापर्यंत पदांचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेतपण नियमांमध्ये बदल झाले नव्हते.    रिक्त पदे भरण्यासाठी हे सेवा प्रवेश नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू केला.अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होत्याअनेक पात्र कुटुंबेज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची मुले आणि पत्नी यांचा समावेश होता.  याबाबतचे सर्व शासन निर्णय बदलून एक सुटसुटीत आणि सोपा शासन निर्णय तयार केला.  अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीततर ती शासनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांच्या घरी एखादा अपघात झाल्यासत्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहेया भावनेतून आम्ही काम केले. याच बदलांमुळे आज ८०% अनुकंपाच्या जागा भरल्या गेल्या आहेतआणि उर्वरित २०% जागाही लवकरच भरल्या जातील असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi