Monday, 6 October 2025

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार

 नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेपद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि  आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रात जागृती घडवून आणली. या दोघांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण हे 'पद्मस्मरणआहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्याने १० हजार टीपीडीपर्यंत आता मजल मारली आहे.  ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहेअसे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. या क्षेत्राच्या विकासाचे श्रेय  डॉ.विठ्ठलराव विखे पाटीलधनंजयराव गाडगीळवैकुंठभाई मेहता यांना जाते. त्यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या भागात सहकार चळवळ पोहोचलीसहकारी साखर कारखाने पोहोचलेतिथला शेतकरी समाधानी झाला आणि त्या ठिकाणचे औद्योगीकरणदेखील चांगल्याप्रकारे झालेइथला शेतकरी संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi