मनरेगा प्रमाणेच महानिर्मिती कंपनीद्वारेही शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येईल. बांबूची बाजारपेठ व किंमत निश्चितीही राज्य शासन करेल. यासंबंधी उर्जा विभागाच्या माध्यमातून धोरण आखून बांबू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील बांबू मिशन हे मिशन मोडमध्ये राबवणार आहोत. या परिषदेतील चर्चासत्रातून आलेले मुद्दे धोरण बनवण्यासाठी उपयोगी ठरतील आणि त्यांचा गांभीर्याने विचार करून धोरणात समावेश करू, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment