Thursday, 11 September 2025

तृतीयपंथीनाही समान वागणूक मिळावी यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी -

 तृतीयपंथीनाही समान वागणूक मिळावी यासाठी

योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

 

मुंबई, दि. 10 : समाजातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणआरोग्य आणि रोजगारात समान संधी देत योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच त्यांना मोफत  व उच्च शिक्षण मिळावे यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. आतापर्यंत 4783 तृतीयपंथीयांना ओळखपत्र जारी करण्यात आले आहेत. उर्वरित ओळखपत्र लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तृतीयपंथीयांच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन योजना तयार करणेधोरणांचा आढावास्वतंत्र कक्षओळखपत्रस्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्याबाबत तसेच विभागीय व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांसह तृतीयपंथी संरक्षण व कल्याण महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi