Tuesday, 19 August 2025

राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून

राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा

नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

 

         मुंबई दि 19 : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवताघाबरून जाऊ नये.सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्या.

राज्यातील मुंबईठाणे ,रायगड रत्नागिरी ,पालघर या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच घाटमाथ्यावरील भागावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दर तीन तासाला पावसाबाबत अहवाल सादर केला जात आहे. पावसामुळे जे बाधित लोक आहेत त्यांना सहकार्य  करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi