प्रेरणादायी यशोगाथा
सातारा जिल्ह्यातील परळी गावातील अंजना शंकर कुंभार यांनी पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मातीच्या सुबक वस्तू, गणेश मूर्ती, टेराकोटा शिल्पकला, मातीची भांडी आणि खेळणी तयार केली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानांतर्गत त्यांनी ‘जय सदगुरू कृपा’ नावाचा स्वयंसहाय्य गट स्थापन केला, ज्यामध्ये 12 महिला कार्यरत आहेत. या गटाने दीड वर्षांपूर्वी ‘उमेद’ योजनेंतर्गत सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले, ज्याच्या मदतीने त्यांनी आपला व्यवसाय विस्तारला आणि पुणे, मुंबई, पाटण आणि सातारा येथील बाजारपेठांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या या यशाची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचली आहे. श्रीमती कुंभार यांना राष्ट्रपती भवनातील विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले असून, त्या आपल्या पतीसह या समारंभात सहभागी होणार आहेत.
0000
No comments:
Post a Comment