रेरा कायद्यानुसार विकासकावर कारवाई होणार
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १७ : रेरा कायद्यानुसार प्रत्येक विकासकाने स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर रेरा कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर संबंधित विकासकावर कारवाई करण्याचे अधिकार रेरा प्राधिकरणाकडे असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले.
सदस्य गजानन लवटे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मंत्री श्री.सामंत म्हणाले, अकोट नगरपरिषद हद्दीतील इमारत बांधकाम परवानगी प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अकोला यांच्या दालनात दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी सुनावणी घेण्यात आली होती.
अर्जदाराने ३१ मार्च २०२१ रोजी बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर केला होता. अर्जासोबत २००७-०८ मधील गुंठेवारीसंदर्भातील कागदपत्रे जोडली होती, मात्र मूळ नोंदी २०१८ मधील आगीत नष्ट झाल्या आहेत. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तत्कालीन अधिकाऱ्यांनी १८ एप्रिल २०२२ रोजी ऑफलाइन परवानगी दिली. बीपीएमएस प्रणाली अपूर्ण असल्याने परवानगी ऑफलाइन देण्यात आली होती, मात्र नंतर ऑनलाइन नोंद करण्यात आली असून शुल्कही भरलेले आहे. रेरा कायद्याप्रमाणे अर्जदाराने परवानगी घेतलेली नाही त्याच्यामुळे रेराने त्यावर कारवाई करावी असे पत्र रेराला देण्यात येईल.
No comments:
Post a Comment