Tuesday, 15 July 2025

कांदिवलीच्या साईबाबा नगर येथील भूखंड प्रकरणाची चौकशी डीसीपी स्तरावर होणार

 कांदिवलीच्या साईबाबा नगर येथील भूखंड प्रकरणाची चौकशी डीसीपी स्तरावर होणार

                                        – मंत्री डॉ. उदय सामंत

मुंबईदि. 15 कांदिवलीच्या साईबाबा नगर येथे जमिनमालक नानुभाई भट यांना येथील संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली होती. सन 1978-80 दरम्यान या 18 भूखंडापैकी 8 भूखंड महापालिकेने घेतले तर 10 विकले गेले. मात्रविक्री झालेल्या 10 भूखंडांशी काहीही संबंध नसलेल्या 8 भूखंडावरील विकासकामे करायला स्थगिती देण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकारी करत असून आता मात्र ही चौकशी उपायुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांकडून केली जाईल. यासंदर्भात आजच मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात येतीलअशी माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

बोरिवलीतील साईबाबा नगर परिसरातील 18 भूखंडांसंदर्भात विधानपरिषद सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी एका लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधलेत्यावेळी मंत्री डॉ.सामंत बोलत होते. या प्रकरणात एका महिला अधिकाऱ्याचे नाव आल्याचे नमूद करून त्यांनी सांगितले कीत्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास कोणतीही अडचण नाही. पदोन्नती होऊन महानगरपालिका उपायुक्त झाल्यानंतरही त्या त्याच जागेवर कार्यरत आहेतयामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईलअसेही मंत्री डॉ.सामंत यांनी यावेळी सांगितले.

मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले कीसाईबाबा नगर येथील ज्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पांवर स्थगिती आहेती काही कायदेशीर अडचणींमुळेही थांबलेली आहेत. मात्रसंबंधित कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अशा प्रकल्पांना परवानगी देण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात येतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi