Monday, 24 March 2025

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याचा ठराव पणन मंत्री यांनी विधानसभेत मांडला

 महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना

'भारतरत्नपुरस्कार देण्याचा ठराव पणन मंत्री यांनी विधानसभेत मांडला

 

मुंबईदि. २४ : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणन मंत्री जयकुमार रावल यांनी  विधानसभेत मांडला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षितवंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करतसामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालूनअस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना "भारतरत्न" या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडल आहे.

मंत्री श्री. रावल म्हणाले,  भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारणकलासाहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंतशास्त्रज्ञउद्योगपतीलेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना  "भारतरत्न" या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi