जिजाऊ - शिवरायांनी बांधून घेतलेले धरण !
- ऐतिहासिक वारसा पाहायला येणार का?
शिवरायांच्या बालपणाचा काळ. जिजाऊ-शिवरायांचे शिवापूर परिसरात वास्तव्य होते. सिंहगडाच्या घेऱ्याचा भाग. त्या काळी तो चांगल्या पावसाचा प्रदेश होता. सिंहगडाच्या परिसरात उगम पावणारी शिवगंगा नदी तिथून वाहते. पण एक समस्या होती. पावसाळ्यात भरपूर पाऊस. शिवगंगा दुथडी भरून वाहायची, पण नंतरच्या काळात शेतीसाठी, बागांसाठी, लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसे. मग यावर उपाय काय?
तिथं धरण बांधलं तर पाणी वर्षभर मिळणार होतं. रांजे गावाजवळ कुसगावच्या हद्दीत हे धरण बांधायचे ठरले. अवतीभवती असलेल्या गावांच्या पाटलांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबतची कथा अशी सांगते- जिजाऊ-शिवरायांनी ही जबाबदारी सोपवल्यावर एक अडथळा होता. तो म्हणजे एक मोठी धोंड होती, ती फुटता फुटत नव्हती. कोंढव्याच्या कामठे पाटलांनी हे आव्हान पेलले आणि मोहीम फत्ते केली. तिथे धरणाचे बांधकाम केले. ते इतके पक्के आहे की, आज तब्बल पावणे चारशे वर्षांनंतरही हे धरण दिमाखात उभे आहे. त्याचा चिराही ढासळलेला दिसत नाही.
इतका मोलाचा वारसा असलेले हे धरण तुम्ही ते पाहिले आहे का?... ते पाहण्याची, समजून घेण्याची संधी "भवताल" तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. हे धरण आणि इतर ऐतिहासिक जलव्यवस्था पाहण्यासाठी शनिवार-रविवार, १६-१७ सप्टेंबर २०२३ या काळात दोन दिवसांची इकोटूर आयोजित करण्यात आली आहे. ज्यांना आपल्या वारशाबद्दल कुतूहल आहे, त्याच्यासाठी खास हे आयोजन आहे.
तुम्ही सहभागी होताय ना?
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लिंक:
https://bhavatal.com/Ecotour/Watersystems
संपर्कासाठी:
9545350862 / 9922063621
मर्यादित जागा असल्याने नावनोंदणीसाठी फार वेळ दवडू नये, हे आवाहन.
- भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
95
45350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment