Sunday, 3 September 2023

मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत

 मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे,

दोषींवर कठोर कारवाईचे निर्देशआंदोलकांच्या भावनांशी सहमत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठा आंदोलकांच्या भावनांशी सहमती व्यक्त

 

मुंबईदि. २ :- "मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमारहवेतील गोळीबारबळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

            मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेकजाळपोळहिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेकजाळपोळहिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेकजाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्यालोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

            मी मराठा समाज बांधवांनामराठा संघटनांचे नेतेपदाधिकारीकार्यकर्ते यांना आवाहन करतो कीराज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावं. राज्याच्या साधनसंपत्तीचे नुकसान होणार नाही. आंदोलनामुळे आपल्या माता-भगिनींच्याबांधवांच्या जीवाला धोका होणार नाहीयाची काळजी घ्यावी. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्यामहाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तत्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतताकायदा-सुव्यवस्था कायम राहिलयासाठी आपण सर्वांनी सहकार्यप्रयत्न करुया...," अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील जाळपोळीच्याहिंसाचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मराठा आंदोलक नेत्यांनाकार्यकर्त्यांना केले आहे. राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावेअसे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे.

०००

दि. 2 सप्टेंबर २०२३


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi