उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनईद-ए-मिलादच्या शुभेच्छा
मुंबई, 27 सप्टेंबर : ईद-ए-मिलादनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबर यांची शांततेची शिकवण अंगीकारणे हेच महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “ईद-ए-मिलाद हा सण परस्परांमधील विश्वास आणि प्रेम वाढविणारा आहे. मोहम्मद पैगंबर यांनी सर्व मानव जातीच्या कल्याणाचा संदेश आपल्या आचारातून आणि विचारातून दिला आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जाताना संपूर्ण मानव जातीचा साकल्याने विचार केला पाहिजे. परस्परातील सामंजस्य आणि प्रेम वाढीस लागणे हे सर्वात महत्त्वाचे आहे”.
No comments:
Post a Comment