अंजनगाव सूर्जी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचेकाम लवकरच पूर्ण करणार
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 25 : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम विहित वेळेत पूर्ण केले नसल्याने संबंधित कंत्राटदारांवर १ जानेवारी २०२३ पासून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि अंजनगाव सूर्जी शहरास सुरळीत पाणीपुरवठा होईल.
0
No comments:
Post a Comment