Tuesday, 14 March 2023

जल जीवन मिशनच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार

 जल जीवन मिशनच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करणार


- मंत्री गुलाबराव पाटील


मुंबई, दिनांक 14: जल जीवन मिशन योजनेची रायगड जिल्ह्यात विविध कामे सुरू

आहेत. या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या आणि मुदतीत कामे पूर्ण न

करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात

प्रश्न उपस्थित केला होता.


मंत्री श्री. पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत

1430 योजना मंजूर आहेत. एकूण 1259 कोटी रुपयांची ही कामे आहेत. नुकतेच

यातील बहुतांशी कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तसेच कामांची

संख्या जास्त आणि कंत्राटदार संख्या कमी अशी स्थिती असल्याने एकच

कंत्राटदाराला अनेक कामे दिल्याचे रायगडसह इतर जिल्ह्यांतही दिसते. मात्रकार्यारंभ आदेश असूनही कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यातयेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनीसहभाग घेतला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi