Saturday, 14 February 2026

तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

 तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, "पंजाबमध्ये गाय 10-15 लिटर दूध देतेतर आपल्याकडे 2.5 लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.  पशुधन संवर्धन,  आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशनचा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात 'मदर्स डेअरीसोबत करार देखील करण्यात आला आहे.

शेतीला 'क्लायमेट रिस्क' मधून वाचवणार

 शेतीला 'क्लायमेट रिस्कमधून वाचवणार

मुख्यमंत्री म्हणाले, "हे प्रदर्शन कोरडवाहू शेतीतील हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाले तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करते. त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्त्व न देता तिचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन राज्यमाता’ दर्जा दिला आहे."

महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर

 परळीतील अंबेजोगाई रस्ता लगत असलेल्या ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभाग आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेआमदार धनंजय मुंडेआमदार रत्नाकर गुट्टेपशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी  एनआयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरेविभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर,  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सनप्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधवमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठम कुलगुरू डॉ. नितीन पाटीलपशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणेखासगी सचिव मंदार वैद्यअपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणेउपविभागीय अधिकारी अरविंद लाठकरतहसीलदार व्यंकटेश मुंडेपशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्तबहुसंख्येने पशुपालक उपस्थित होते.

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार

 पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'महा पशुधन एक्स्पो’ 2026 ला मुख्यमंत्र्यांची भेट

मंत्री पंकजा मुंडेंची 'पशुधन उद्योजकयोजनेची घोषणा

परळी वैजनाथ (दि. 14): "आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहेत्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल," असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा

 राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा

-सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबईदि. १३ : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांना एकत्रित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहकार भवनची उभारणी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बांधकामाधीन तसेच प्रस्तावित सहकार भवनाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. याबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

सहकार राज्यमंत्री डॉ .भोयर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात विविध जिल्ह्यात बांधकामाधीन व प्रस्तावित सहकार भवनसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार व सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणालेसहकार भवनच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता व प्रशासकीय मंजुरीच्या प्रस्तावांबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी. सहकार भवनच्या माध्यमातून जिल्हास्तरावर सहकारी संस्थांना एकाच छताखाली कार्यालयीन सुविधा आणि समन्वयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

 

नियोजित आराखड्यानुसार आणि निश्चित वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.

 

बैठकीत संबंधित विभागीय अधिकारी व जिल्हास्तरीय यंत्रणांनी सहकार भवनांच्या बांधकाम प्रगतीचे सादरीकरण केले. सहकार भवनांसाठी निधी उपलब्धता, तांत्रिक मंजूरी आणि कामांची सद्यस्थिती याबाबत सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 'स्मार्ट ग्राहक, सक्षम बाजार': ग्राहकांना नेमके काय

 संवाद परिषदेत विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 'स्मार्ट ग्राहकसक्षम बाजार': ग्राहकांना नेमके काय माहीत असायला हवे?  यामध्ये मध्य मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा वंदना मिश्राग्राहक वकील संघटनेचे अ‍ॅड. उदय वारुंजीकर तसेच संदीप वाहीउपाध्यक्षविक्री आणि प्रशिक्षणइंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. श्री. प्रांजल डॅनियलमुख्य रणनीतीकारयांनी मते मांडली. यामध्ये ग्राहकांनी थेट विक्री प्लॅटफॉर्मची निवड कशी करावी आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा वापर कसा करावायाचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी'उद्योजकतेतून महिला सक्षमीकरण': महिला बचत गट आणि थेट विक्रेत्यांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा (ज्ञानदाकारंदवाडी (सांगली)जय महिला बचत गटसाक्री (धुळे) आणि इतरांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कायदे आणि नियम तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा त्यांची अंमलबजावणी

 अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर म्हणाले की, "कायदे आणि नियम तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा त्यांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होते. ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहणे आवश्यक आहे आणि कंपन्यांनी त्यांच्या वर्तणुकीसाठी उत्तरदायी असणे गरजेचे आहे.  या संतुलनामुळेच एक सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण होईल."

Featured post

Lakshvedhi