Monday, 1 December 2025

किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार ·

  किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि

प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार

·         ४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी, ८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

 

      मुंबई दि. २० : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या जागतिक संधी निर्माण करण्याच्या कौशल्य विकास विभागाच्या उद्दिष्टानुसार मंत्रालयात कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

 

      या करारान्वये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील ४५ आयटीआय संस्थांमध्ये ( एलएमव्हीहलकी वाहन तंत्रज्ञ अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तेथे शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ८ हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. येत्या दोन महिन्यात कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च २६ पर्यंत पहिल्या टप्प्यात १३ प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी दिली. तर तीन टप्प्यात उर्वरित प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत 6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025 youthfestival.srmd.org

 क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत

6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025

 

मुंबईदि. 20 : शहरातील तरूणांसाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी जिओ वर्ल्ड गार्डनवांद्रे येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत श्रीमद राजचंद्र मिशन यांच्या सहकार्याने ग्लोबल युथ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यामध्ये १०,००० पेक्षा जास्त तरुण मन:शांतीअॅडव्हेंचरआर्ट्सकल्चरसंगीतयोग-ध्यानसमाजाभिमुख उपक्रम आणि (स्किल-बिल्डिंग) कौशल्य विकास यांसारख्या अनोख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

 

क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्यानेहा देशातील आघाडीचा युवक उत्सव ठरणार आहे. आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवण्यासाठी हा उत्सव तरुणांची चळवळ म्हणून उभी राहील.

 

लंडन आणि पुण्यासारख्या शहरानंतर ग्लोबल यूथ फेस्टिव्हल या वर्षी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. ग्लोबल यूथ कम्युनिटी ही २० पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 170 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेली तरुणांची एक प्रेरणादायी चळवळ आहे. क्रिएटर्सव्यावसायिककलाकारउद्योजक आणि चेंजमेकर यांनी एकत्रित येऊन ग्लोबल यूथ कमिटी तयार केली आहे.

 

हजारो लोकांना एकत्र आणणारे सायकलथॉनसारखे उपक्रमग्रामीण विकासासाठी केलेले अनेक प्रकल्पआरोग्यप्राणी-कल्याणशिक्षण यांसाठी उभारलेले उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ मनोरंजन नसून प्रभाव आणि परिवर्तनाचा उत्सव ठरणार आहे.

 

संगीत किंवा कला अशा एखाद्या विषयापुरते मर्यादित न राहताग्लोबल युथ फेस्टिवल हा समग्र अनुभव देणारा उत्सव आहे. महिला सक्षमीकरणबालशिक्षणग्रामीण विकासप्राणी-कल्याणपर्यावरण संवर्धन यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांचे प्रात्यक्षिक देशातील सर्वात मोठा आऊटडोअर साउंड हीलिंग अनुभवसंगीतकलाध्यानजर्नलिंगपॉटरीड्रम सर्कल अशा मजेशीर पॉप-अप अ‍ॅक्टिव्हिटीज यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी youthfestival.srmd.org येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या

 गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी

आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या

                                                 -पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

 

मुंबई,दि.24 : गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 128 एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार असूनयाबाबतचा आढावा  पर्यटनखनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज  देसाई यांनी यावेळी दिले.

            मेघदूत या निवासस्थानी गोराई प्रकल्पाबाबतचा आढावा घेताना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेपर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणेउपसचिव विजय पोवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

टूर सर्कीट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील चैत्यभूमीराजगृहडॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स महाविद्यालयवडाळाडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपरळमधील बीआयटी चाळसिद्धार्थ महाविद्यालयफोर्ट या स्थळांचा समावेश आहे.  या टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवाससामाजिक समताशिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.

            टूर सर्कीट अंतर्गत दररोज 3 बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवाससहल मार्गदर्शकअल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन संचालनालयाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन संचालनालयाने या सर्किटचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी हे टूर सर्किट महत्त्वपूर्ण ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ  3 डिसेंबर 2025रोजी सकाळी  9.30 वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर गणपती मंदिरशिवाजी पार्क येथे पार पडेल. सदर टूर सर्कीटची सुरुवात चैत्यभूमीदादरमुंबई येथून सकाळी 9.30 वाजता होऊन  सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर येथे होणार आहे.

000

*सहलीसाठी संपर्क :* 

सूरज चतुर्वेदी - ८१०८१७५५३०

पवन पवार – ७६६६६०३२११                                

पर्यटन संचालनालय चॅटबोट क्र – ९९९३३०८८८३


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टूर सर्कीटचे आयोजन

-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयाचा कौतुकास्पद उपक्रम

मुंबईदि.29 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून  पर्यटन संचालनालयामार्फत दि. 3, ते 5 डिसेंबर 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील चैत्यभूमी येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी  महान कार्यत्यांचे जीवनचरित्रविचार  पर्यटक व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या टूर सर्कीटचा मुख्य उद्देश आहे.पर्यटकांनी या पर्यटन सर्किटचा  लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन सर्किट ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसूनभारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्यसंघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रमइतिहाससंस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांना जोडणारा प्रेरणादायी प्रवास आहे. या परिपथामुळे अनुयायीपर्यटकांना बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसूनसमानतास्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे, असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले.

पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई shebox.wcd.gov.in

 पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

 

कायद्याप्रमाणे तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखास कलम 26 नुसार 50,000 रुपयांपर्यंत दंड तसेचउल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास दंड दुपटीने वाढविणेआस्थापनेचा परवाना रद्द करणे किंवा अन्य कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. अंतर्गत समितीची माहिती केंद्र सरकारच्या शी बॉक्स पोर्टलवर (shebox.wcd.gov.inअद्ययावतपणे अपलोड करावी.

 

तसेच नागरिक ज्या कार्यालये किंवा आस्थापनांना भेट देतीलत्या ठिकाणी अंतर्गत समितीचा फलक प्रदर्शित नसेलतर त्याबाबत तक्रार 181 या महिला हेल्पलाईनवर तक्रार करावी. असे आवाहनही आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.


सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना पोश कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी

 सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना पोश कायद्याची

काटेकोर अंमलबजावणी करावी


-महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे       

· पोश कायद्याचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड

मुंबई, दि. 28 : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व सरकारी विभाग, निमशासकीय संस्था तसेच खासगी आस्थापनांनी प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती तातडीने गठीत करण्याचे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. 

ज्या कार्यालये किंवा आस्थापनांमध्ये 10 किंवा त्याहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कंपनी, नगरपरिषद, तसेच शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाकडून निधी प्राप्त करणाऱ्या सर्व संस्थांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे खासगी कंपन्या, उद्योग, सेवा पुरवठादार संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, मनोरंजन क्षेत्रातील संस्था, क्रीडा संघटना, क्रीडा संकुले आदी सर्व खासगी आस्थापनांनाही हा नियम लागू आहे.

Featured post

Lakshvedhi