Monday, 10 February 2025

आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे

 आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे

- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

मुंबई, दि. 10 : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावेअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंदरेवित्तीय सल्लागार प्रमोद पेटकरमहाव्यवस्थापक (प्रशासन) सुनील सोवितकरमहा व्यवस्थापक (ऑपरेशन) रामेश्वर कुंभार उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या कीमोफत आरोग्य सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. यासाठी प्रभावी जनजागृतीआशा कार्यकर्त्याअंगणवाडी सेविकाआणि ग्रामसेवक यांच्या मदतीने घरगुती सर्वेक्षण व लाभार्थी सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात यावीअशा सूचना राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिल्या.

प्रधाननमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ  जास्तीत जास्त रुग्णांना होण्यासाठी व तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावीअसेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी आरोग्य सुविधामनुष्यबळ आदीबाबींचा आढावा घेतला.

0000

लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या

 लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. 10 : बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यादृष्टीने परिसरातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पर्यटनखनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात लोणार सरोवराच्या जतनसंवर्धनआणि विकास आराखडा संदर्भात बैठक झाली. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटीलएमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीतसेच व्हीसीद्वारे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटीलसहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोडपुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक उपस्थित होते.

 

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटकांसह संशोधन करणारे पर्यटकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञही अनेकवेळा येथे येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात यावी. पर्यटन विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगणसंग्रहालयचिल्ड्रन पार्कगार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी यावेळी दिले. या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोपवेची सुविधा करता येईल का, यासंदर्भात पाहणी करावी.

जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला....

 हे माहीती आहे का ?


👉 जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने  स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला....

तो राजा म्हणजे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील पहिलीच "जमीन

सातबारा पद्धत" सुरु करणारे आणि त्यानुसार सारा (Tax) पध्दत याचे

निर्माते -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना

"पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे

जगवा"

म्हणजेच सामाजिक वनीकरण ही

संकल्पना सत्यात उतरवणारे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि

मृत्यु किल्ल्यावरच झाला तो राजा म्हणजे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे

आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे

झाले तरी आजही १२०+ देशात अभ्यास

चालु आहे असे एकच जिजाऊंचे पुत्र -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगाच्या इतिहासातील पहिलेच स्वराज्य ज्या काळात

एकही भिकारी कधी पहायला

मिळत नव्हता त्या सुवर्णकाळाचे साक्षात् परमेश्वर -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड"

जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी

राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते

म्हणजे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

 👉छत्रपती शिवाजी यांचा फोटो भारतातील काही लोकाना  १००० च्या नोटेवर हवेत


पण एक  कवी कवितेतून  काय म्हणतो ते पहा ••••

👇


"नकोय शिवराय नोटेवर"


नकोय शिवराय

आम्हा नोटेवर |

विकला जाईल 

तो वाटेवर ||


आहेत समाजात 

काही दरिंदे |

नाहीत ते

कुठलेच परिंदे ||


घेऊन जातील शिवराय

दारुच्या अड्यावर |

लावतील त्यालाही

सट्यावर ||


म्हणतील,

शिवराय

 घ्या |

अन् 

दारू द्या ||


होतील ते 

पिऊन  तराट   |

माजवतील कल्लोळ 

घरात ||


नाचणारींवर जाईल

पैसा उधळला |

नाचता-नाचता तोही

जाईल तुडवला ||


फोफावला आहे

भ्रष्टाचार |

नाही उरलेला

शिष्टाचार   ||  


भाटाच्या ताटी

जाईल थोपवला |

गणीकांच्या हाती

जाईल शिवराय सोपवला ||


खाटीकाच्या दुकानात

जातील घेऊन त्याला |

मंदिरात  येतील

देवासमोर ठेवुन त्याला ||


नाही विकणाऱ्यांमधला तो |

नाही मांडायचा

आम्हाला त्याचा शो ||


फाटुन जाईल

हृदय आमचं |

नाही ऐकणार

आम्ही तुमचं ||


राहुद्या तुमचा

गांधीच नोटेवर ||


शिवराय आमचे 

शोभतात सिहासनावर  || 


💐💐 जय शिवराय  💐💐

मित्रांनो आपले मत काय आहे , कृपया पाठवा जर योग्य असेल तर पुढे पाठवा.🚩🚩🚩🚩🚩🚩

मला आलेली पोस्ट मला पटली म्हणून पुढे पाठवित आहे.


.

धन्यवाद.

जय शिवाजी जय भवानी,

जय महाराष्ट्र,जय अखंड भारत.

शौक से खाओ और shukse बिमार रही कैसे लगि

 


राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून १३ राज्यांतील १११ जिल्ह्यांमध्ये

 राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून १३ राज्यांतील १११ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पालघरनांदेडगडचिरोलीभंडारा व चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असून त्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसीअल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधांचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२७ पर्यंत या आजाराचे देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे.

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून शुभारंभ हत्तीरोगग्रस्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून शुभारंभ

हत्तीरोगग्रस्त नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. १० : राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने येत्या आज १० फेब्रुवारीपासून राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या राष्ट्रीयस्तरावर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाला असूनराज्य स्तरावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत हत्तीरोगग्रस्त नागरिकांनी सहभागी व्हावेअसे आवाहन दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने १० फेब्रुवारीपासून १३ राज्यांतील १११ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पालघरनांदेडगडचिरोलीभंडारा व चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असून त्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसीअल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधांचा वापर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने २०२७ पर्यंत या आजाराचे देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे.

देशात २० राज्यांतील ३४८ जिल्ह्यांमध्ये हत्तीरोग (लिम्फ्याटिक फायलेरियासिस) या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. परंतु जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देशामध्ये १९५७ पासून विविध जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशामुळे हत्तीरोग या आजाराचे ७ राज्यांतून दुरीकरण शक्य झाले आहे. हत्तीरोग हा दुर्लभ आजार आहे. दूषित क्युलेक्स डासांच्या चाव्यामुळे हा आजार होतो. याचे प्रदूषित पाण्यात प्रजनन होते.

००००

छत्रपती संभाजी नगर मधील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

 छत्रपती संभाजी नगर मधील जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. 10 : जल जीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण ११६४ योजनांची  कामे जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला.  नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७  योजना असूनउर्वरित ४४० कामे पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही  करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत योजनांची आर्थिक आणि भौतिक प्रगती, सिल्लोडगंगापूर-वैजापूर ग्रीडदेवगावपिशोरलाडसावंगीकेळगावचारनेरशिरसाळा३५ गावे औरंगाबादरेल कनकावतीनगर पाणी पुरवठा योजनांची सद्य:स्थितीकामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या समस्या१०० दिवस कार्यक्रम अंतर्गत पूर्ण करण्यात येणाऱ्या कामांचा मंत्री श्री. पाटील यांनी आज मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नळ जोडणी अंतर्गत ७१८ गावांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नळ जोडणीच्या १४ च्या राबविण्यात येत आहे. यामध्ये १४ लाख २२ हजार ६५१ लोकसंख्येत २ लाख ८५ हजार ९८ घरे आहेत. २ लाख २६ हजार ६५४ नळ जोडणी पूर्ण केली असूनदोन लाख ३७ हजार ११५ नळ जोडणी १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत साध्य करण्यात येणार आहे.

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेविशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरेछत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.) जल  जिवन मिशनचे अभियान संचालक इ. रविंद्रनमुख्य अभियंता मनिषा पलांडेकार्यकारी अभियंता दी. ह. कोळीअजित वाघमारेवरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

Featured post

Lakshvedhi