Sunday, 12 January 2025

*भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?*

 . 


*भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?*


यावर आपण एक उदाहरण बघू.


तीन महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते.


जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (जेवण बनवू नये. अन्न शिजवू नये.)


तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी *सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.*


# भोजन तीन प्रकारचे असते.

(१) जे आपण हॉटेलमध्ये खातो,

(२) जे घरात आई, पत्नी बनवते आणि

(३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन.

तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.


(१) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.


(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. 


परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.


घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असतं, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.


(३) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.


आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.


स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.


परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम , वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.


अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून *कृष्णार्पणमस्तु* किंवा *शिवार्पणमस्तु* म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते. सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद.!



*श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ*

🙏🏼🌹🙏🏼🌻🙏🏼🌻🙏🏼🌹🙏🏼


.

Ka,? कशा साठी

 *1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?*

*Infections spread टाळण्यासाठी.*


*2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?*

*Infections spread टाळण्यासाठी.*


*3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?*

*(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)*

*कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.*

*त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.*

*या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.*


*काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.*

*त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.*

*इथे कारण उलटे असते*

*कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.*


*4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?*

*आलं का logic लक्षात.*


*5) शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे,*

*पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही.*


*6) हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?*

*आता western लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा.*


*7) घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?*

*Logic लक्षात घ्या.*


*8. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....?*

*उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो.*

*या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...?*


*9)*

*आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.*


*10*

*जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे.*

*असे का...?*

*इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही...!*

*आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे.*

*आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.*


*11*

*एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही?*

*कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप,रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. Nonveg खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.*


*12*

*उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे..?*

 भारतीय पद्धतींचा logical विचार करा.*

*त्या बरोबर आहेत .👍*


*_आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे._*


🙏 *आपली आणि आपल्यांचीं काळजी घ्या*🙏

Saturday, 11 January 2025

बीड zilhachya प्रथिमिक शिक्षक भरतीचा......

 


जैन पाठशाळांना अनुदान, विहार धाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय

 जैन पाठशाळांना अनुदान, विहार धाम निर्माण करण्याचा जैन आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय


महामंडळाच्या योजनांसाठी सहकार्य करू - मंत्री दत्तात्रय भरणे


मुंबई ः जैन धार्मिक ट्रस्ट च्या वतीने चालवण्यात येणार्‍या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना व जैन साधु-साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहारधाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसर्‍या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यक मंत्री नाम. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्री दालनात संपन्न झालेल्या बैठकीची माहीती देताना ते बोलत होते. या बैठकीस अल्पसंख्यक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, उपसचिव मो.बा.ताशिलदार, जैन महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनिल पाटणी, व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम, विशेष निमंत्रित संदीप भंडारी, जयेश ओसवाल, नीरव देढीया यांच्यासह उपसचिव विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळातुन राबवावयाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन, व्यापार, उद्योग , शेती कर्ज, महिला बचतगट अर्थसहाय्य, गृह कर्ज, विधवा पेन्शन या योजना एप्रिल 2025 पासून सुरू करण्यासाठी अतिरीक्त निधि ची मागणी केली. अल्पसंख्यक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळाच्या योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन देऊन अतिरीक्त निधि उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे बैठक आयोजित करू असे सांगितले.
जैन मंदीर, स्थानक, संघ या नोंदणीकृत संस्थाद्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात अशा पाठशालामध्ये जैन विद्यार्थी, जैन महिला शिक्षण घेतात त्यांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेल्या प्राकृत भाषेचे, संस्कृत भाषेचे तसेच संगणक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्याचा तसेच पूर्णपणे पायी विहार (यात्रा) करणार्‍या जैन साधू साध्वींना त्यांच्या यात्रा मार्गात सोय नसलेल्या ठिकाणी विहारधाम निर्माण करताना ते प्राधान्याने सरकारी, निमसरकारी शाळांच्या क्षेत्रात उभारले जातील त्यामुळे या सुविधांचा शाळांसाठी सुध्दा उपयोग होईल असाही निर्णय घेण्यात आल्याची माहीती अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
अल्पसंख्यक मंत्रालयाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या गतीशील कामकाजासाठी मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली.
व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदुम यांनी सभा संचलन व आभारप्रदर्शन केले.

फोटो कॅप्शन ः जैन आर्थिक विकास महामंडळाच्या दुसर्‍या संचालक मंडळ सभेत मार्गदर्शन करताना मंत्री नाम. दत्तात्रय भरणे, अध्यक्ष ललित गांधी, सचिव रूपेश जयवंशी व इतर मान्यवर

पौष शुक्ल द्वादशी, आजच्याच शुभ मुहूर्तावर

 पौष शुक्ल द्वादशी, आजच्याच शुभ मुहूर्तावर ५०० वर्षांचे स्वप्न साकार झाले, ज्या राम मंदिराच्या मुक्ततेचा ध्यास मनाला लागला होता तो पुर्ण झाला, आपण भाग्यवान आहोत आयोध्येत आपल्या समोर श्रीरामाचे मंदिर प्रत्यक्षात उभा राहिले आणि प्राणप्रतिष्ठा झाली, आज प्रथम वर्षपूर्तीचा दिवस, सर्वांना हार्दिक शुभेच्छा 


 


🙏 *🚩जय श्रीराम l 🚩*🙏

मेयो' व 'मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे

 मेयोव 'मेडिकलमधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

कॅम्पसला भेट देवून कामांना गती देण्याचे निर्देश

 

नागपूरदि. 11 : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) याबाब विश्वासार्हता अधिक असून. येथील वैद्यकीय सेवा-सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे आराखड्यानुसार कालमर्यादेत पूर्ण करावीतअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल)  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटकेमोहन मतेआशीष देशमुखवैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारेमहानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरीवैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवालेअधिष्ठाता डॉ. रवी चव्हाणडॉ. राज गजभियेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

देखरेखीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम

मेयो आणि मेडिकलची प्रगतीपथावरील कामेसद्यस्थितीअडी-अडचणीकामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.  तसेच येथील वीजेची गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस सौर ऊर्जेवर असावा. सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा. उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतीमधील प्रसाधनगृहांची देखभाल योग्य प्रकारे व्हावी यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना ही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी केल्या.

 

 

मेयो आणि मेडिकल येथे सुरू असलेल्या कामांचा एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री  श्री फडणवीस सांगितले.


रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे है,

 रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है,

जो पेड़ हमने लगाया पहले,

उसी का फल हम अब पा रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


इसी धरा से शरीर पाए,

इसी धरा में फिर सब समाए,

है सत्य नियम यही धरा का,

है सत्य नियम यही धरा का,

एक आ रहे है एक जा रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


जिन्होने भेजा जगत में जाना,

तय कर दिया लौट के फिर से आना,

जो भेजने वाले है यहाँ पे,

जो भेजने वाले है यहाँ पे,

वही तो वापस बुला रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


बैठे है जो धान की बालियो में,

समाए मेहंदी की लालियो में,

हर डाल हर पत्ते में समाकर,

हर डाल हर पत्ते में समाकर,

गुल रंग बिरंगे खिला रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है,

जो पेड़ हमने लगाया पहले,

उसी का फल हम अब पा रहे है,

रचा है सृष्टि को जिस प्रभु ने,

वही ये सृष्टि चला रहे है ॥


Featured post

Lakshvedhi