Sunday, 25 June 2023

तूपतुपः ।। घ्रुतम् आयुः।। , सहस्रवीर्य विधिभिघ्रुतं कर्मसहस्रक्रुत्।।

 *तूप....*


जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले कि मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे, एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातला एक अविभाज्य घटक आहे..


तुपः ।। घ्रुतम् आयुः।। , सहस्रवीर्य विधिभिघ्रुतं कर्मसहस्रक्रुत्।।


ज्याच्या आहारात थोड्या फार प्रमाणात तुप रोज आहे तो निरोगी आयुष्य दिर्घकाळ जगतो. सर्व प्रकारच्या स्निग्ध पदार्थात तूप हे सर्वश्रेष्ठ आहे.. शरिराची दर क्षणाला झिज होत असते, ती भरून यायला शरिरात स्निग्धता लागते..


◼️सात धातूंमध्ये मज्जा हा धातू सर्वात श्रेष्ठ धातू होय. शरिराच्या ठिकठिकाणाच्या कार्यास तुपाची मदत मोठी होते, आयुर्वेदाप्रमाणे तूप हे आयुष्यवर्धक व मधूर रसाच्या पदार्थात श्रेष्ठ आहे, शरिराला तुपामुळे स्थैर्य मिळते, बुद्धि, धारणा शक्ति, स्मरणशक्ति वाढवणे याकरता तूप माफक प्रमाणात रोज घ्यावे.


◼️घ्रुत हे शित गुणांचे असून वात व पित्त विकारात काम करते, अरूची, भूक न लागणे, अग्निमांद्य, या विकारात अग्निवर्धन होते, शीतपित्त, व गांधी उठणे या विकारात, तुपात कालवून मिरेपुड लावली तर अंगाची खाज कमी होते,


◼️आम्लपित्तात, नियमाने सकाळी व संद्याकाळी पंधरा ग्रँम तूप घ्यावे, स्रियांच्या प्रदर विकारात गुणकारी आहे, क्रूश व्यक्तिने कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यावर थोडे तुप गरम पाण्याबरोबर घ्यावे,


◼️ज्यांचा कोठा रुक्ष आहे, बद्धकोष्ठ आहे, त्यांनी रोज रात्री एक कप गरम दुधासोबत एक चमचा तूप घ्यावे.


◼️कान सतत वाहणे, कानात आवाज येणे, कान कोरडे पडणे, तसेच डोळे रूक्ष होणे, डोळ्यांचा वाढता नंबर, डोळे लाल होणे, या विकारात रसायनकाली म्हणजे सकाळी, वीस ग्रँम तूप खावे..


◼️उष्णतेने केस गळत असल्यास, केसात खवडे, चाई, फोड होत असल्यास, नियमित तूप खावे, कुरूप या विकारात कुरूप कापण्यापेक्षा, शतघौत तुप तिथे घासावे, बरे होतात. शांत झोपेकरता, तळपायाला, कानशिल, कपाळपट्टि, यांना तूप चांगले जिरवावे.


◼️वात, गुल्म, पोटात फिरणारा वायू गोळा याकरता जेवणाच्या सुरुवातीला तूप चमचाभर खाउन जेवण संपतांना पुन्हा चमचाभर खावे.


◼️शरिरातील कोणतिही जखम भरून येण्यास व आतड्यातील व्रण भरण्यास तुपाचे सेवन गुणकारी आहे..


◼️क्रुश व्यक्तिच्या छातीत दुखणे, क्षयरोग, थुंकीतून रक्त पडणे, कडकी, बारीक हाडे ताप या विकारात नेमाने तुप खावे, बल मिळते,. सततची डोकेदुखी, असल्यास नाकपुडीत दोन थेंब तुपाचे टाकावे,


◼️तोंड आल्यास, अल्सर झाल्यास जिभेला तुप चोळावे. त तोंडात तुप धरावे,


◼️त्वचा विकारात , खाज व आग, थांबवण्याकरता, विशेषतः सोरायसिस मद्ये तुप खाणे लाभदायी आहे,


◼️समस्त विषविकारात पोटात घेण्यासाठी तुपासारखा उपाय नाही, विषाच्या दहा गुणाविरूद्ध लढा देण्यास तुपाचे दहा गुण आहेत, चुकिच्या औषधांचे परिणाम डोळ्यावर, त्वचेवर, केसांवर, किडनीवर, झाल्यास , सकाळी तूप घ्यावे.


◼️फिटस् येणे, आकडी, विस्मरण, उन्माद, या वातविकारात, पोटात तूप घ्यावे, तळहात, पाय, कानशिले, यांना तूप घासावे, लकवा, तोंडावरून वारे जाणे, तोंड वाकडे होणे, या विकारात, नाकात दोन थेंब तुप टाकावे, डोळ्यात टाकावे


◼️मूळव्याधीत गरम दूधात तुप घालून प्यावे, वारंवार गर्भपात होत असल्यास तूपाचे नियमित सेवन केल्यास गर्भाशय बलवान होते, कँसर व्याधित केमोथेरपी, रेडिएशन, यांचे दुष्परिणाम टाळण्याकरता तूपाचे सेवन करावे. शुद्ध तुपाने चेहर्‍यावर मालिश केल्यास चमकतो, मुलायम राहतो,


◼️डाळ शिजतांना तूप टाकल्यास गँस होत नाही.


◼️तुपामध्ये विटामिन ए. डी. व कँलशिअम, फाँस्फोरस, मिनरल्स, पोटँशिअम, असे अनेक पोषक तत्वे असतात,


*तेव्हा, आपल्या आहारात नक्कीच तूप कायम असावे. देशी गाईचे तूप अतिउत्तम.*


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,




मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी

 मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी

सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश





            मुंबई, दि. 25: पावसामुळे सांताक्रुझ, मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची पावसात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले. 


            यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार, उप प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) विभास आचरेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री म्हणाले, मिलन सबवे या भागात पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. यावर्षी पाण्याचा निचरा करण्यासाठी हजारो लिटर क्षमतेचे वॉटर टॅंक कार्यान्वित करण्यात आले आहेत. सकल भागातील पाणी पंपिंगद्वारे उचलून साठवण टाक्यांमध्ये साठवण केले जात आहे. त्यामुळे येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. याच धर्तीवर मुंबईतील इतर सखल भागातही अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश दिले. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर रुममधील यंत्रणा मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.


            दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोडचे काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाणी साचण्याची कारणे जाणून घेतानाच या भागात पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.


 


00000

आला पाऊस, भिजले अंगण..........

 


पर्यावरण दिवस कधीही असो पणश्री समर्थ रामदास स्वामी लिखित 'बाग' प्रकरण अवश्य वाचावे लागेल.

 पर्यावरण दिवस कधीही असो पण आपले ऋषी मुनी नित्यच पर्यावरणावर प्रेम करणारे व त्याचे जतन करणारे आहेत उदाहरण घ्यायचे तर

श्री समर्थ रामदास स्वामी लिखित 'बाग' प्रकरण अवश्य वाचावे लागेल.

         या प्रकरणात समर्थांनी तब्बल २९५ झाडांची नावे सांगितली आहेत. एका संताचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास आजही आपल्याला थक्क करून सोडणारा आहे.

कल्याणस्वामी व इतर शिष्यांच्या साहाय्याने त्यांनी अनेक मठात अश्या बाग जतन केल्या असाव्यात.  


प्रसंग निघाला स्वभावें । 

बागेमध्ये काय लावावे ।

म्हणूनि घेतली नावे । 

काही एक ॥


कांटी रामकांटी फुलेकांटी । 

नेपती सहमुळी कारमाटी ।

सावी चीलारी सागरगोटी । 

हिंवर खैर खरमाटी ॥


पांढरफळी करवंदी तरटी ।

आळवी तोरणी चिंचोरटी ।

सिकेकाई वाकेरी घोंटी । 

करंज विळस समुद्रशोक ॥


अव्हाटी बोराटी हिंगणबेटी ।

विकळी टांकळी वाघांटी ।

शेर निवडुंग कारवेटी । 

कांटेशेवरी पांगेरे ॥


निरगुडी येरंड शेवरी । 

कासवेद कासळी पेरारी ।

तरवड उन्हाळ्या कुसरी । 

शिबी तिव्हा अंबोटी ॥


कांतुती काचकुहिरी सराटी ।

उतरणी गुळवेल चित्रकुटी ।

कडोची काटली गोमाटी । 

घोळ घुगरी विरभोटी ॥


भोंस बरु वाळा मोळा । 

ऊंस कास देवनळा ।

लव्हे पानि पारोस पिंपळा । 

गुंज कोळसरे देवपाळा ॥


वेत कळकी चिवारी । 

ताड माड पायरी पिंपरी ।

उंबरी अंबरी गंभिरी । 

अडुळसा मोही भोपळी ॥


साव सिसवे सिरस कुड । 

कोळ कुंभा धावडा मोड ।

काळकुडा भुता बोकडा । 

कुरंडी हिरंडी लोखंडी ॥


विहाळ गिळी टेंभुरणी । 

अवीट एणके सोरकिन्ही ।

घोळी दालचिनी । 

कबाबचीनी जे ॥


निंबारे गोडे निंब । 

नाना महावृक्ष तळंब ।

गोरक्षचिंच लातंब । 

परोपरीची ॥


गोधनी शेलवंटी भोंकरी । 

मोहो बिब्बा रायबोरी ।

बेल फणस जांब भरी । 

चिंच अंबसोल अंबाडे ॥


चांफे चंदन रातांजन । 

पतंग मैलागर कांचन ।

पोपये खलेले खपान । 

वट पिंपळ उंबर ॥


आंबे निंबे साखरनिंबे । 

रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।

तुरडे विडे नारिंगे । 

शेवे कविट अंजीर सीताफळे ॥


जांब अननस देवदार । 

सुरमे खासे मंदार ।

पांढरे जंगली लाल ।

पुरे उद्वे चित्रकी ॥


केळी नारळी पोफळी । 

आवळी रायआवळी जांभळी ।

कुणकी गुगुळी सालफळी ।

वेलफळी माहाळुंगी ॥


भुईचांफे नागचांफे मोगरे ।

पारिजातक बटमोगरे ।

शंखासुर काळे मोगरे ।

सोनतरवड सोनफुले ॥


जाई सखजाई पीतजाई । 

त्रिविध शेवंती मालती जुई ।

पाडळी बकुळी अबई । 

नेवाळी केतकी चमेली ॥


सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी ।

जास्वनी हनुमंतजास्वनी ।

केशर कुसुंबी कमळिणी । 

बहुरंग निळायाति ॥


तुळसी काळी त्रिसेंदरी । 

त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।

गुलखत निगुलचिन कनेरी ।

नानाविध मखमाली ॥


काळा वाळा मरुवा नाना । 

कचोरे गवले दवणा ।

पाच राजगिरे नाना । 

हळदी करडी गुलटोप ॥


वांगी चाकवत मेथी पोकळा ।

माठ शेपु खोळ बसळा ।

चवळी चुका वेल सबळा ।

अंबुजिरे मोहरी ॥


कांदे मोळकांदे माईणमुळे ।

लसूण आलें रताळें ।

कांचन कारिजे माठमुळे । 

सुरण गाजरें ॥


भोंपळे नाना प्रकारचे । 

लहानथोर पत्रवेलीचे ।

गळ्याचे पेढ्या सांगडीचे । 

वक्र वर्तुळ लंबायमान ॥


गंगाफळ काशीफळे क्षीरसागर ।

सुगरवे सिंगाडे देवडांगर ।

दुधे गंगारूढे प्रकार । 

किनऱ्या रुद्रविण्याचे ॥


वाळक्या कांकड्या चिवड्या ।

कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।

खरबूजा तरबुजा कलंगड्या ।

द्राक्षी मिरवेली पानवेली ॥


दोडक्या पारोशा पडवळ्या ।

चवळ्या कारल्या तोंडल्या ।

घेवड्या कुही-या खरमुळ्या ।

वेली अळूचमकोरे ॥


अठराभार वनस्पती । 

नामे सांगावी किती ।

अल्प बोलिलो श्रोतीं । 

क्षमा केली पाहिजे ॥

दादर प्राणी संग्रहालय

 New Aqua zoo at Dadar absolutely fascinating and exciting. Do visit it's amazing and Paisa vasool...👍🏻👍🏻

मुलांनाअवश्यदाखव

आला पाऊस


 

पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे.*

 *पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे.* 


निरोगी आरोग्यासाठी झोप का महत्वाची आहे ते पाहुया. यासाठी झोपलेल्या अवस्थेत शरीरात कोणती कार्ये होत असतात याची माहिती घेऊया.


१. झोपेत शरीरातील ऊर्जेचे संवर्धन होते. या अवस्थेत शरीराच्या हालचाली अत्यल्प असल्यामुळे ऊर्जेची बचत होते. अभ्यासक सांगतात ८ तासाच्या झोपेमुळे ३५% टक्के ऊर्जेची बचत होते. यामुळेच शांत झोपून उठल्यावर आपण ताजेतवाने होतो.


२. दिवसभरात ग्रहण केलेल्या माहिती पैकी उपयुक्त माहिती दीर्घकाळासाठी स्मरणात ठेवण्यासाठी ती योग्य ठिकाणी साठवली जाते आणि अनावश्यक माहितीचा कचरा मेंदूतून काढून टाकला जातो. त्यामुळे झोपून उठल्यावर मेंदू तरतरीत आणि ग्रहणक्षम बनतो.


३. दिवसभरात पेशींची मोडतोड किंवा झीज होते. पेशींच्या दुरुस्तीचे आणि पुनरुज्जीवनाचे कार्य झोपेतच होते. त्यामुळेच झोप पूर्ण झाली असेल तर शरीर पुढील दिवसासाठी सक्षम होते.


४. रोगप्रतिकारक शक्ती बळकट बनविणे, इन्सुलिनचा योग्य वापर करणे आणि हृदयावरचा भार कमी करण्याचे कार्यही झोपेतच होते.


५. झोपेत आपण काही खात नाही म्हणूनच भुकेचे जे दोन हार्मोन्स आहेत ghrelin आणि leptin यांचे नियंत्रण योग्य प्रकारे होते. त्यामुळे वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.


तर मित्रहो किमान सहा ते आठ तास शांत झोप घेण्याचा प्रयत्न अवश्य करा.


 *माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका 🙏🏻*


डॉ. प्रमोद ढेरे,




Featured post

Lakshvedhi