Thursday, 22 June 2023

नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.


            मुंबई, दि. 22 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मुंबई यांनी केले आहे.


            अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. या योजनेसाठी इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 30 जून 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार

 बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत करणार


- ॲड. श्रीमती सुशीबेन शाह, अध्यक्ष, बाल हक्क आयोग


 


            मुंबई, दि. 22 : पोक्सो व बाल न्याय अधिनियम या कायद्यांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी सांगितले.


            महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत कोकण विभागातील सहा जिल्ह्यांत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य, विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग) दीपक पांडे, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभागाचे, खासगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


            यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यातील बाल कल्याण समितीचे सदस्य, जेजेबी चे सदस्यांनी पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा राबवताना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली व कायद्यांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी सूचना केल्या.


            अध्यक्ष ॲड. शाह यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पोक्सो व बाल न्याय अधिनियम कायदा अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देवून बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे सांगितले. तसेच सपोर्ट पर्सन, सदस्यांकडून शिफारशी मागवून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल. सर्व कर्मचारी व सदस्यांनी आपसात संवाद साधल्यास अजून जोमाने व गंभीरपणे कार्य करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.


            बैठकीस उपस्थित लोकायुक्त (निवृत्त) न्या. वि. एम. कानडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. पोलीस दल आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून पोक्सो व बाल न्याय अधिनियमासंदर्भात प्राप्त माहितीचे विश्लेषण बाल हक्क आयोगाच्या सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण व मजलिस संस्थेच्या संचालक ऑड्री डिमेलो यांनी केले. यावेळेस सखी सावित्री कायद्याची जनजागृती करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली.


*****

संधीवात रोग*

 *संधीवात रोग* 


संधीवात या रोगात, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये सूज उद्भवते आणि रुग्ण वेदनांनी त्रस्त राहतो. चालण्यात त्रास व वेदना जाणवतात. या रोगामुळे शरीराच्या तंतुंमध्ये विकार निर्माण होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, सांधे सूजतात, चालण्यात त्रास होतो. कधीकधी ताप येतो, भूक न लागणे देखील या आजाराचे लक्षण आहे. वेळेवर उपचार न केल्यास डोळे, फुफ्फुसे, हृदय आणि इतर अवयव प्रभावित होऊ लागतात.


संधिवात कारणे


 १) अनुवांशिक कारणे

 २) चुकीचे फास्ट फूड

 ३) सांध्यावर अधिक शारीरिक दबाव, ४) जोड्यांचा कमी किंवा जास्त वापर करणे

 ५) तंतुंमध्ये विकार आणि चयापचय मध्ये त्रास.

 ६) थंड वातावरणात राहण्या मुळे दुष्परिणाम

 ७) वृद्धत्व आणि हार्मोन असुंतुलन


 *काय काळजी घ्यावी ?* 

१) सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णाला हवामानानुसार २४ तासांत ३ ते ४ लिटर पाणी पिण्याची सवय लावावी. यूरिक अँसिड शरीराच्या सांध्यामध्ये जमा होतो आणि त्यापासून या वायू रोगाचा जन्म होतो. जास्त पाणी प्यायल्यामुळे जास्त लघवी होईल आणि यूरिक अँसिड बाहेर निघून जाईल

२) फळं आणि हिरव्या भाज्या आपल्या आहारात मुबलक प्रमाणात समाविष्ट करा. त्यात समृद्ध अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. रोजाना ५०-५० ग्रॅम फळे किंवा भाज्या किंवा दोन्ही वापरत रहा. जर तुम्ही यांचा रस प्यायला तर तुम्हाला तेच फायदे मिळतील.  


 ३) ताज्या गाजरचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा आणि दररोज अर्धा कप सेवन करा. 

४) काकडीचा रस पिल्याने संधिवातात फायदेशीर ठरते.


५) संधीवात असलेल्यांनी हिवाळ्यामध्ये उन्हात बसावे. त्यामुळे Vit-D तयार होते

६) चहा, कॉफी, मांसामुळे रुग्णालां आजार उद्भवू शकतात त्यामुळे ते टाळावे. किमान प्रमाण तरी कमी करावे.

७)साखरेचा वापर हानिकारक असतो.

८) तळलेले अन्न, मीठ, साखर, मिरची-मसाले, अल्कोहोल वर्ज्य असते.

९) संधीवाताच्या रुग्णाला आठवड्यातून दोन दिवस उपवास करणे आवश्यक आहे.


१०) कॉड लिव्हर ऑईल 5 ml. सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यास संधीवात कमी होऊन त्वरित लाभ मिळतो.

११) कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी पूरक आहार घेणे आवश्यक असते.. जर आपण हे जीवनसत्त्वे अन्नाद्वारे घेत असाल तर ते अधिक चांगले .

१२) तीन लिंबू रस आणि 40 ग्रॅम इप्सम सॉल्ट अर्धा लिटर गरम पाण्यात मिसळा आणि एका बाटलीमध्ये भरा. आणि हे सकाळी आणि संध्याकाळी 5 मिलीलीटर औषध प्या. ही कृती खूप प्रभावी आहे.

 १३) संधीवात रोगात बटाट्याचा रस पिण्याने आराम मिळतो. दररोज २०० मिलीलीटर रस प्यावे हा पण प्रयोग प्रभाव शाली आहे.

१५) अधिक पायर्‍या चढणे हानिकारक आहे.

१६) विश्रांती दरम्यान संतुलन राखणे महत्वाचे आहे.

१७) आल्याचा रस पिल्याने संधीवातात होणाऱ्या वेदना कमी होते.

 १८) मिक्सरमध्ये जवस (अळशी) बिया घालून पावडर बनवा. आणि सकाळी २० ग्रॅम आणि संध्याकाळी २० ग्रॅम पाण्यात घ्या. यामध्ये ओमेगा फेटी अँसिड असते, जे या आजारात खूप फायदेशीर मानले गेले आहे. यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास देखील मदत होते. जवसाच्या सेवनाने अंगात कधी उष्णता होऊ शकते. जर असे झाल्यास प्रमाण कमी करावे आणि पाणी मात्र भरपूर प्यावे.


१९) चोपचीनी: कोकणात यास घोट वेल म्हणतात. जर ही मिळत असेल तर तिचा काढा करून प्यावा याने युरीक अँसीड कमी होईल.


२०) शिवाय निलगिरी तेल, दालचीनी तेल, राई तेल, कापूर आणि लवंग तेल ही बाजारातून आणून सम प्रमाणात मिक्स करून याने घुडगे किंवा दुखंणाऱ्या भागावर नित्य मालिश करून त्या भागावर सोसवेल इतक्या गरम पाण्याची धार धरावी. याने घामावाटे युरीक अँसीड तसेच त्या भागातील विष द्रव्ये निघून जातील.


अशा आजारासाठी असे काही उपाय आपण घरच्या घरी करुन गुण तर येईलच. पण कोणत्याही गोष्टीत जर श्रध्दा ठेवली आणि श्रध्दा पूर्वक केली तर तर त्याचा परिणाम पण चांगलाच येतो.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,



वेळ चुकली तरी चालेल,पण दिशा चुकली तर काळ घात करतो,कालाय तस्मै नमः

: *आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे* 

दोन दिवसापूर्वी सर्व वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनल वर बातमी दाखवली ,आणि काळजाचा ठोकाच चुकला ,

नुकत्याच MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, कोपरगाव ची *दर्शना पवार* महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, 26 वर्षी वनक्षेत्र विभागात अधिकारी *RFO* तिचे व तिच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले.

काही दिवसातच कुटुंबाचे धुळीस मिळाले,

पुण्याला सत्कार समारंभासाठी आली, कार्यक्रम संपल्यानंतर मित्राबरोबर राजगड फिरण्यासाठी गेली व तिथेच तिचा खून झाला, ज्या मित्राबरोबर गेली होती तो मित्र गायब आहे,

 *दर्शना पवार* अतिशय हुशार मुलगी होती परीक्षा साठी दोन वर्ष तिने घरात कोंडून घेतले होते ती अधिकारी झाल्यावर संपूर्ण गावाने तिचा सत्कार केला होता, तिच्या आणि आई-वडिलांच्या कष्टाचे फळ मिळाले होते पण एका दिवसातच सगळे 'होत्याचे नव्हते झाले,'

ज्याला आपण मित्र मैत्रिणी म्हणतो तेच एकमेकांच्या जीवावर उठले आहेत मैत्रीच्या नावाखाली, अनेक मुलींची फसवणूक होत आहे, आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत चाललेली आहे मित्र-मैत्रिणी बाहेर फिरायला जाणे, विविध प्रकारचे व्यसन करणे, पब च्या नावाखाली तोकडे कपडे घालून दारू पिऊन रात्रभर बीभत्सपने नाचणे, आपले शौक पूर्ण करण्यासाठी मित्र-मैत्रिणीचे नाते जोडणे, अशा पद्धतीने आजची तरुणाई चुकीच्या मार्गाने जात आहे,

आई वडील कबाड कष्ट करत आहेत, मुलींना विश्वासाने घराच्या बाहेर पाठवतात, आमच्या आयुष्यात जे आम्हाला मिळाले नाही जे आम्ही भोगले आहे, ते आमच्या मुलांच्या वाट्याला यायला नको, म्हणून ते आपल्या जिवाचा आटापिटा करत आहे ,आजचे तरुण मुले त्यांच्या ह्याच गोष्टीचा फायदा घेत आहेत,

 *चेन्नई च्या उच्च न्यायालयाने* आजच्या तरुण पिढी बद्दल खेद व्यक्त करताना म्हटले की चित्रपटातील अश्लील शब्द आणि गाणी हिंसाचार या सर्व गोष्टीमुळे आजच्या तरुणांवर परिणाम होत आहे, त्यात आणखी भर म्हणजे सोशल मीडिया व मोबाईल एक व्यसन झाले आहे,

ग्रामीण भागातील आई वडील शिक्षणासाठी, आपल्या मुला-मुलींना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी पाठवत असतात, त्यांच्या कष्टाची त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची जाणीव, मुला-मुलींनी ठेवली पाहिजे, आपल्या मुलांना अडचण यायला नको म्हणून, ते फक्त पैसे पाठवण्याचे काम करत असतात ,आणि हे तरुण शिकायचे सोडून असले धंदे करत असतात,हल्ली पुण्या मुंबई सारख्या शहरात कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुली सर्रास पणे वाईन शॉप मध्ये जाऊन दारू खरेदी करताना दिसतात, स्त्री पुरुष समानता वैगरे सर्व मान्य केले तरी अल्पवयीन मुला मुलींना उपलब्ध होणारी दारू आणि स्वयराचार योग्य आहे का .तसेच आपण आपल्या पाल्याना पुढील काळात येणाऱ्या या परिस्थितीतला तोंड देण्यासाठी कसे तयार करावे. हे पालकांसमोर एक आव्हान आहे.?

आजचे तरुण विद्यार्थी कुठे चुकत आहे, यापेक्षा त्यांनी आपली जीवनशैली, विचारसरणीत काही गोष्टी आत्मसात केल्या तर, सकारात्मक गोष्टी घडु शकतात. आपला मुलगा मुलगी सध्या कुठलेही शिक्षण घेत असल्यास प्रथमच विचार करा, की आपण जे करीत आहोत त्यांच्या जीवनात कसा उपयोग होईल. दिशा नसली तर हवेतील विमान व पाण्यातील जहाज पण भरकटतात , आयुष्यात प्रसंग व अपघात पण घडतात. त्या मुळे *दिशा निश्चित करा* स्वतःचे कौटुंबिक सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी तुम्ही आम्ही नक्कीच प्रयत्न करू यात

 *विजय खरात* 🙏

 *पनवेल नवी मुंबई*

[

हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-*

 *हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-* 


टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे.


टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाट्या खालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.


*औषधी गुणधर्म :-* 


कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस 'अ', 'क' जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.


*उपयोग :-* 


◼️ आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.


◼️ टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कार्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.


◼️ अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.


◼️ रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोच्या १ कप रसामध्ये १००० इ.यु. 'अ' जीवनसत्त्व असते. तसेच 'क' जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.


◼️ टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.


◼️ पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.

टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.


*सावधानता :-* 

टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.


*संकलन-*


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(

हजार पंखुड़ी वाला कमल फूल के दर्शन भाग्यो से होते हैं 🌸🌸

 🌸🌸हजार पंखुड़ी वाला कमल फूल के दर्शन भाग्यो से होते हैं 🌸🌸


शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील

 शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा पुरविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील


दिलखुलास कार्यक्रमात संचालक विकास पाटील यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 21 : राज्यात खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा माफक दरात उपलब्ध होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, असे कृषी आयुक्तालय, पुणे येथिल निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून सांगितले आहे.


            खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हंगाम असतो. या हंगामात पीक पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे व कृषी निविष्ठांची गरज भासत असते. अशावेळी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागामार्फत खरीप हंगामात होणाऱ्या पीक पेरणीसाठी कशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे, बियाणाबाबत होणारी फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत याबाबत सविस्तर माहिती श्री.पाटील यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 22, शुक्रवार दि.23 आणि शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक महेश जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000

Featured post

Lakshvedhi