Friday, 16 June 2023

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला

 आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला


- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित


        मुंबई दि. १६ : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला हा संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात विहित मुदतीत उपलब्ध होणार असल्याचे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.


            मंत्री डॉ. गावित म्हणाले, मा. राज्यपाल यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय झालेला आहे. सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


0000

राष्ट्रीय आमदार संमेलनात नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचेओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन

 राष्ट्रीय आमदार संमेलनात नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचेओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन


 


            मुंबई, दि. १६ : देशातील विधानपरिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नावीन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.


            एमआयटीच्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय आमदार संमेलन प्रदर्शन कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, पद्मविभूषण तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, एमआयटीचे विश्वनाथ कराड आदी मान्यवर उपस्थिती होते.


            संमेलनात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सामाजिक नावीन्यपूर्ण प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट काम केलेल्या देशभरातील ७५ मंत्री, आमदारांच्या कामाची माहिती, उत्कृष्ट ७५ स्टार्ट अप, जगभरातील लोकशाही देशांची माहिती आणि भारतीय छात्र संसद याबाबतची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली.


माती आणि पाण्याच्या उपक्रमाचे श्री बिर्ला यांच्याकडून कौतुक


            देशभरातून विविध मान्यवरांनी आणलेल्या माती आणि पाणी यांची पाहणी मान्यवरांनी केली. देशातील ५० आमदारांनी युथ पार्लमेंट स्थापन करणार असल्याचे यावेळी सांगितले. या उपक्रमाचे लोकसभा अध्यक्ष श्री. बिर्ला यांनी कौतुक केले. १५ जून ते १७ जून या कालावधीत आयोजित या संमेलनात अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यात राज्यातील विकासकामांबद्दल चर्चा, अनुभव, कल्पना आणि विविध योजना या विषयांवर विचारमंथन होणार आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.


000

जनहिताची जपणूक करत लोकशाही बळकट करावी

 जनहिताची जपणूक करत लोकशाही बळकट करावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023


            मुंबई, दि. 16 :- जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            'एमआयटी'च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे लोकप्रतिनिधी यांचे राष्ट्रीय विधायक संमेलन भारत 2023 चे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, सुमित्रा महाजन, मीरा कुमार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, 'एमआयटी'चे विश्वनाथ कराड, देशातील विधानमंडळांचे पीठासन अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. लोकशाहीची मूल्ये भारतीयांच्या मनात घट्टपणे रुजली आहेत. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात भक्कम अशी लोकशाही पद्धती मानली जाते. ही आपणा सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. लोककल्याणकारी राज्यासाठी आवश्यक असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना आहे. या अमृत काळात भारताची लोकशाही अधिक मजबूत होत आहे. देश सर्वार्थाने विकसित होत आहे. संसदीय लोकशाहीत विविध विचारधारा असू शकतात, मार्ग वेगळे असू शकतात मात्र आपल्या सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. ते म्हणजे भारतीय लोकशाही मजबूत करणे, समृद्ध करणे. आपल्याकडे उभारण्यात आलेल्या यंत्रणा आणि व्यवस्था अतिशय उत्तम आणि पारदर्शक आहेत. सर्व व्यवस्थांच्या भूमिका आणि मर्यादा अगदी सुस्पष्ट आहेत. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात निवडणूका अतिशय निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होतात. समाजातील तळागाळातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा विधिमंडळात प्रतिबिंबित होत असतात. कोणत्याही सरकारला विधानमंडळात विधेयक मांडल्याशिवाय कोणताही खर्च करता येत नाही, ही आपणास लोकशाहीने दिलेली अमूल्य भेटच आहे. आपण सर्वजण जनतेला उत्तरदायी आहोत ही भावना आपण नेहमी जपली पाहिजे.


            विधिमंडळात सर्व पक्षांनी विधेयकावर सांगोपांग चर्चा केलीच पाहिजे. त्यानंतरच सर्वाच्या विचाराने, एकमताने जनहिताचे कायदे तयार केले पाहिजेत. राष्ट्रीय विधायक संमेलन या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यासंदर्भात सखोल विचारमंथन होईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले, देशातील विधानमंडळांच्या पीठासीन अधिकाऱ्यांसाठी आयोजित हे संमेलन अतिशय उपयुक्त ठरेल. संसदीय लोकशाही परंपरा अधिक समृद्ध करण्याची उज्वल परंपरा याव्दारे कायम राहील. भारतीय लोकशाही बळकट करण्यात सर्वच देशवासीयांचे अमूल्य योगदान असून विश्वस्त भावनेतूनच ही परंपरा पुढे नेण्याची गरज असल्याचे अॅड. नार्वेकर यांनी सांगितले.


            लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, 'वसुधैव कुटुंबकम्' ही आपली संस्कृती आहे. ती आपण जपली पाहिजे. आपल्याला राजमाता जिजाऊ आणि अहिल्याबाई यांचा वारसा लाभला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सगळ्यांना सोबत घेऊनच जनहिताची कामे केली पाहिजेत. समाजाला योग्य मार्गावर पुढे नेणारा म्हणजे नेता. महिला कुटुंबाचा सर्वार्थाने विकास करतात. समतोल साधण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे महिला राजकारणात अधिक यशस्वी होऊ शकतात. विविध राज्यांतील चांगल्या प्रथा-परंपरांचे अनुसरण, आदानप्रदान आपण करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाच्या प्रयत्नांत आपण सर्वांनी मिळून योगदान दिले पाहिजे, असेही श्रीमती महाजन यांनी सांगितले.


            भारतभरातून विधिमंडळ सदस्यांनी आणलेल्या जलकुंभाची आणि मृत्तिकाघटाची पाहणी मान्यवरांनी केली. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात सर्व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीच्या घंटेचा निनाद यावेळी करण्यात आला‌.


            या संमेलनात देशभरातील सुमारे दोन हजार मंत्री,आमदार सहभागी झाले आहेत.


-----000-------

आयुर्वेद आणि स्वास्थ्य.*

 *आयुर्वेद आणि स्वास्थ्य.*


आयुर्वेदात सर्व आजार होण्याची महत्त्वाची दोन (सिद्धांत) कारणे सांगितलेली आहे. रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार), रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमूत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे).


रोगा सर्वेपि मंदाग्नौ (भूक मंदावणे, अन्न पचनासंबंधीचे आजार)-आयुर्वेदाने सामान्यात: सर्व आजाराचे महत्त्वाचे कारण हे “अग्नी मंद असणे” हे सांगितले आहे. आजाराच्या प्रमुख कारणापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भूक न लागणे, भूक नसताना वेळ झाली म्हणून पिशवीत सामान कोंबतो तसे पोटात काहीतरी टाकणे तर याउलट भूक लागली असताना वेळ नाही म्हणून (व्यवसाय, मिटींग इत्यादी) जेवण न घेणे किंवा त्याऐवजी वडापाव, कचोरी, समोसा व इतर काही चटकमटक खाद्यपदार्थ खाणे. आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आहार संभवं वस्तु रोगश्चाहारसंभव! अर्थात आहारापासून शरीराचे पोषण होते व याच्या अयोग्य सेवनाने विविध आजार होतात. तच्च नित्यं प्रयुजिंत स्वास्थ येनानुवर्तते! अजातानां विकारणां अनुत्पन्त्तिकरं यत! अर्थात ज्यामुळे आपले आरोग्य संवर्धन होईल व संभाव्य आजार टाळले जातील, अशा प्रकारचे भोजन घ्यावे. हे भोजन उष्ण, स्निग्ध व योग्य मात्रेत घ्यावे. अतिघाईने, अति हळूहळू, बडबड करीत, खूप हसत जेवन करू नये थोडक्यात मन लावून जेवावे, टीव्ही समोर बसून जेवण टाळावे.


आपल्याला बऱ्याच वेळा भूक लागल्यासारखे वाटते आपण जेवणपण घेतो पण ती भूक खोटी असते. भूक नसताना सवयीने वेळ झाली म्हणून आपण जेवन करतो, हे चुकीचे आहे. पोट जड वाटणे, अंग जड पडणे, सुस्ती वाटणे, आळस येणे, तोंडाला पाणी सुटणे, तंद्रा येणे, मन प्रसन्न नसणे, सतत चिंता असणे, उत्साह न वाटणे इत्यादी लक्षणे असताना भूक लागल्यासारखी वाटली तरी जेवण घेऊ नये ही लक्षणे कमी झाल्यानंतरच भोजन घ्यावे. तरच ते पचते. अन्यथा अनेक आजाराला आमंत्रण दिल्यासारखे आहे. थोडक्यात पचायला हलका, बलवर्धक असा आहार आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याने घेणे अधिक चांगले आहे.

आयुर्वेदाच्यादृष्टीने पाणी देखील जेवढी तहान आहे तेवढेच प्यावे. “पिबेंत् स्वस्थोपि अल्पश: अर्थात निरोगी व्यक्तीने देखील पाणी कमी प्रमाणात प्यावे. अत्यम्बुपान अर्थात अति पाणी पिणे हे आरोग्यास हानीकारक ठरते. शरीरातील अग्नीला अन्नाप्रमाणे पाणी पण पचवावे लागते. याबाबत बरेच मतमतांतरे असली तरी आपण स्वत: प्रत्यक्ष याची अनुभूती घ्यावी.


रोगा सर्वेपि जायन्ते वैगोदीरणधारणै (मलमुत्र इत्यादी वेग धारण केल्यामुळे)- सर्वसामान्य रोग होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वेगाने लघवी येणे, शौचास येणे, अधोवायु, उलटी, शिंक, ढेकर, भूक, तहान, रडू येणे, झोप इत्यादी बाबी शरीरात निर्माण झाल्यावर त्यांना थांबवून थोपवून ठेवू नये. या वेगाचा अवरोध केल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. म्हणून याचा अवरोध करू नये.

https://chat.whatsapp.com/G6dpqL1eDIH4pqpcCtbd3w

निदान परिवर्जन अर्थात ज्या कारणामुळे आजार होतात त्या कारणाचा त्याग करणे मानसिक ताण तणाव, व्यायाम न करणे, अजीर्ण अपचन हे रक्तदाब ,मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी आजार वाढविण्यासाठीची महत्त्वाची कारणे आहेत. ही कारणे दूर करणे आजार टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.


आयुर्वेदात “नि:सुखत्वं सुखायच !” हा महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. याचा अर्थ सुखकारक गोष्टीचा त्याग करणे म्हणजेच अंग मेहनतीची कामे व्यायाम चालणे, परिश्रम (शरीरातून घाम येईपर्यंत) इत्यादी गोष्टी सुखी जीवनासाठी आवश्यक आहेत. सध्या श्रमाच्या तुलनेत गरजेपेक्षा जास्त आहार घेतला जातो. सध्या जीवनशैलीत शारीरिक परिश्रमाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहेत. गाडीचा वापर जास्त असल्याने पायी चालणे होत नाही घरात देखील सर्व गोष्टी रिमोटद्वारे (टीव्ही, एसी) केल्या जातात. वॉशिंग मशीन, कुकर, फुड प्रोसेसर, कनिक मळण्याचे यंत्र, पोळी तयार करण्याचे यंत्र इत्यादीचा वापर होत असल्याने शरीर सुखवस्तू बनत चालले आहे व त्यासोबत आपला ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे वजन वाढणे, डायबिटीज, रक्तदाब इत्यादी आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

जर तुमची चयापचय प्रक्रिया चांगली असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या फिटनेस पथ्येचे परिणाम मिळवू शकता. गुडुची सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे आपले चांगले आतड्यांसंबंधी मायक्रोबायोम वाढवते आणि शरीरातील चरबीच्या साठ्याचे नियमन करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते.


दालचिनीसारखे मसाले तुमच्या शरीरात चरबीच्या पेशी तयार होण्यापासून रोखू शकतात, तर हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन चरबीच्या पेशी प्रभावीपणे बर्न करण्यास आणि शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करते.


आयुर्वेद ही एक प्राचीन आणि अत्यंत महत्वाची प्रणाली आहे जी आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. तुमच्या मेंदूच्या आरोग्यापासून ते पोटापर्यंत आणि त्वचेच्या आरोग्यापासून ते हाडांपर्यंत, आयुर्वेदामध्ये तुमच्या एकूण आरोग्यासाठी अनेक रहस्ये आहेत. आयुर्वेदिक टिप्स तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात.


जर तुम्ही नियमितता, संतुलन आणि स्थिरता राखली तर काही आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकता. वैद्यकीय सल्लागार डॉ. दिपेश महेंद्र वाघमारे यांनी आयुर्वेदातील काही खास रहस्ये सांगितली आहेत ज्यामुळे तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता. 

अश्वगंधा, ब्राह्मी आणि तुळशी यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या शरीराला शारीरिक आणि मानसिक तणावासाठी लवचिक बनवतात आणि तुमची ऊर्जा वाढवू शकतात ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फिट आणि उत्साही वाटू शकते.


स्टॅमिना वाढवण्यासाठी 


जर तुम्हाला व्यायाम करताना खूप थकल्यासारखे वाटत असेल, तर कदाचित तुमचा स्टॅमिना वेगाने कमी होत आहे. मानसिक तणावामुळे तुमच्या शारीरिक हालचालींवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की स्टॅमिना कमी होण्याचे कारण तणाव असू शकतो.


आयुर्वेदिक औषधी वनस्पती जसे अश्वगंधा, ब्राह्मी आणि शतावरी शक्ती वाढवतात. हे तुमच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून तुमची मूळ ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे मानसिक आरामही मिळतो.


मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी


जर तुमची चयापचय प्रक्रिया चांगली असेल, तर तुम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्या फिटनेस पथ्येचे परिणाम मिळवू शकता. गुडुची सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे आपले चांगले आतड्यांसंबंधी मायक्रोबायोम वाढवते आणि शरीरातील चरबीच्या साठ्याचे नियमन करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. प्रमोद पाठक.



खालील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा*

 *खालील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा*


1 कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. 


2 दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.


3 जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. 


4 रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. 


5 रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही. 


6 व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. 


7 दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या.


8 नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे. 


9 तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. 


10 पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. 


11 मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. 


12 शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या. आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा. जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा अँझायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका. 


13 आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्राणायाम व ध्यानधारणा करणे, रोजनिशी लिहिणे, छंद जोपासणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.


संकलन-

 डॉ. प्रमोद ढेरे,


खालील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा*

 *खालील काही सामान्य आरोग्यदायी टिप्स पाळा आणि उत्तम आरोग्य मिळवा*


1 कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. 


2 दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील.


3 जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या. 


4 रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या. 


5 रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही. 


6 व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्यासाठी आवश्यकता असेल तर डॉक्टरांना विचारून मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या. 


7 दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. बाजारात मिळणाऱ्या साखरयुक्त पेयांचे सेवन शक्यतोवर टाळा किंवा मर्यादित ठेवा. त्याऐवजी नारळपाणी, ताक, लिंबू सरबत, घरी काढलेले फळांचे ताजे रस यांचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण यातही अतिरिक्त प्रमाणात साखर घालू नका. साध्या पाण्याबरोबरच डिटॉक्स वॉटर किंवा इन्फ्युज्ड वॉटर प्या.


8 नियमित व्यायाम करा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा. जिममध्ये जाणे जमत नसल्यास घरीच व्यायाम करणे ही चांगली कल्पना आहे. दररोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा सायकलिंग किंवा योगासने करणे तब्येतीसाठी उत्तम आहे. 


9 तुमचा स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. संगणकावर बराच वेळ घालवल्यास मधुमेह आणि हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका संभवतो. म्हणूनच कामाचे काही तास सोडल्यास इतर वेळेला डोळे व संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी स्क्रीनटाईम मर्यादित ठेवा. 


10 पुरेशी शांत झोप घ्या. तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण व तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांचा जवळचा संबंध आहे. जर आपल्याला पुरेशी झोप व विश्रांती मिळाली नाही तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि मेंदूवर देखील वाईट परिणाम होतो. म्हणूनच दररोज रात्री सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. 


11 मद्यपान व धुम्रपानापासून लांब राहा. धुम्रपानामुळे शरीराची प्रचंड हानी होते व अनेक गंभीर रोगांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन अजिबात करू नका. मद्यपानामुळेही लिव्हर व किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यामुळे शक्यतोवर मद्यपान करणे टाळा किंवा मद्यपानाचे प्रमाण मर्यादित ठेवा. 


12 शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याचीही काळजी घ्या. आयुष्यातील ताणतणाव व भावनांचे योग्य व्यवस्थापन करा. जर तुम्हाला काही कारणाने नैराश्य किंवा अँझायटी किंवा इतर काही मानसिक त्रास होत असेल तर वेळीच वैद्यकीय मदत घेण्यास संकोच करू नका. 


13 आपल्या मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य जपणे देखील तितकेच महत्वाचे आहे. प्राणायाम व ध्यानधारणा करणे, रोजनिशी लिहिणे, छंद जोपासणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतात आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.


संकलन-

 डॉ. प्रमोद ढेरे,


शासन दिव्यांगांच्या दारी’!प्रत्येक जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होणार

 शासन दिव्यांगांच्या दारी’!प्रत्येक जिल्ह्यात शिबिराचे आयोजन होणार

एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळणार


            मुंबई दि. 15 : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.


            शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान सुरु केले असून आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे या अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आहेत.


            दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक जण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी शासनाने "दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी" हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात एकूण २९ लाख ६३ हजार ३९२ दिव्यांगांची संख्या असून त्यापैकी केवळ ९ लाख दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र प्राप्त झाले आहे, उर्वरित दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्र नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या शिबिरात वैश्विक ओळखपत्र देण्याच्या कार्यक्रमाला गती मिळणार आहे.


            त्याचबरोबर शेत जमिनी संबंधित कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी देखील या एक दिवसीय शिबिराची मदत मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनातून तसेच सामाजिक संस्था यांच्या सीएसआर मधून उपलब्ध झालेली दिव्यांगांना लागणारी विविध उपकरणे देखील वाटप करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात आली असून त्यांची मुख्य मार्गदर्शक म्हणून या अभियानाकरिता नियुक्ती केलेली आहे. या अभियानाची सुरुवात दि. ७ जून रोजी मुंबई येथून करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यात देखील मुख्य मार्गदर्शक यांच्या सूचनाप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे.


मुंबईत एकाच दिवशी साडेतीन हजार दिव्यांगांना लाभ


            'दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी' उपक्रमाची मुंबई येथुन सुरूवात झाली आहे.


            दि. ७ जून रोजी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील ३५०० दिव्यांग व्यक्तींनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. एकूण ६० विभागांचे स्टॅाल या उपक्रमामध्ये सहभागी होते, विविध ९० शासकीय सुविधांची/ योजनांची माहीती व अर्ज या स्टॅालवर उपलब्ध होते, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन यांनी दिली.


****

Featured post

Lakshvedhi