Thursday, 1 June 2023

भवताल मासिका"चा मे २०२३ चा अंक प्रसिद्ध

 भवताल मासिका"चा मे २०२३ चा अंक प्रसिद्ध 


नमस्कार.


भवताल मासिकाचा मे २०२३ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. तो सोबत शेअर करत आहोत.


अंकात पुढील लेखांचा समावेश आहे.

• मुलांना निसर्गाशी जोडण्यासाठी...


• संपलेल्या पायवाटा, सहज अन्न आणि बिबट्याचा वापर


• हुशार कावळ्याची गोष्ट


• श्वास रोखण्याच्या कलेत निष्णात शार्क


• उडण्याऱ्या पालीची नवी प्रजाती


• आणि बरेच काही...


 


आपण अंकासाठी नावनोंदणी केल्यामुळे आपणाला हा अंक देत आहोतच.


जोडीला अंकाचे कव्हर आणि नावनोदणीची लिंक देत आहोत. ती आपल्या संपर्कात पोहोचवून लोकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.


तसेच, आपणही वर्गणीसह अंकाची नावनोंदणी करून ‘भवताल’ च्या कार्याला पाठबळ द्यावे, ही विनंती.


 


नावनोंदणीसाठी लिंक:



https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information


 


- संपादक,


भवताल मासिक

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and

 sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गतइमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

 मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गतइमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित


 


            मुंबई दि. 1 : मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय 31 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.


            मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांनी त्यांना दिलेल्या भूखंडावर इमारतींचे बांधकाम करुन आता ५० ते ६० वर्षांचा कालावधी झाला असून या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास होणे आवश्यक होते. आता अशा इमारतींच्या पुनर्विकासाबाबत नव्या धोरणाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.


            मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था (Post war rehabilitation - २१९ ) अंतर्गत येणाऱ्या इमारतींचा पुनर्विकास सुसाध्य व व्यवहार्य होण्यासाठी अशा संस्थांमध्ये मूळ सभासदांच्या बाबतीत ९० टक्के मागासवर्गीय व १० टक्के अमागासवर्गीय हे प्रमाण जैसे थे ठेवून पुनर्विकासानंतर त्या जागेवर ज्या अतिरिक्त सदनिका तयार होतील. त्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्के व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्के राहील. कोणत्याही परिस्थितीत पुर्नविकासानंतर तयार झालेल्या अतिरिक्त सदनिकांमध्ये मागासवर्गीयांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी राहणार नाही व अमागासवर्गीयांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाही.


            पुनर्विकासानंतर २०% मागासवर्गीय सभासदांसाठी आरक्षित केलेल्या सदनिका / गाळे यांची विक्री ही मागासवर्गीय सदस्यांसाठी करताना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) मार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) निश्चित केलेल्या दराप्रमाणे उच्च उत्पन्न गट (HIG) व मध्यम उत्पन्न गट (MIG) यानुसार तेथील जागा व इमारतीच्या आकारावर अवलंबून असेल त्याप्रमाणे दर आकारण्यात येतील. पुनर्विकासानंतर तयार होणान्या इमारतींमध्ये मागासवर्गीय सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका व खुल्या प्रवर्गातील सभासदांना देण्यात येणाऱ्या सदनिका या सारख्याच दर्जाच्या व समान सोयी-सुविधांयुक्त असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय सभासदांकरिता वेगळी व खुल्या प्रवर्गातील सभासदांकरिता वेगळी इमारत करण्यात येऊ नये. यासर्व बाबींची दक्षता घेण्याची जबाबदारी विकासकावर बंधनकारक राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


०००

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


‘माविम’, जीआयझेड आणि पशु व मत्स्य विज्ञान विज्ञापीठात सामंजस्य करार


 


             मुंबई, दि. १ : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि पशु शक्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.


             महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जीआयझेड (GIZ) व नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विज्ञापीठ यांच्यात सामंजस्य करार सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आला, त्यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ, (माविम), नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक शिक्षण विस्तार डॉ.अनिल भिकणे, जीआयझेडचे जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फबीग, जीआयझेडचे संचालक राजीव अहाळ, रणजित जाधव, जितेंद्र यादव, ओमकार शौचे यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, जीआयझेड (GIZ) या संस्थेबरोबर करार केल्यामुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन शाश्वत शेतीसाठी उपक्रम राबविण्यास मदत होणार आहे.माविमने शाश्वत शेती व बचतगट क्षेत्रात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जीआयझेड या संस्थेला देण्यात येईल. दोन्ही संस्था व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून परस्पर संवादातून महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य, जिल्हा, तालुका व गावस्तरावर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. नागपूर येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध प्रशिक्षणाच्या संधी महिलांना मिळतील. या विद्यापीठांतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये महिलांना शेळीपालन, पोल्ट्री प्रशिक्षण आणि पशुशक्ती प्रशिक्षण देण्यात येतील.या प्रशिक्षणाचा महिलांना नक्कीच आर्थिक स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होईल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांना

 आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांनास्वच्छता - सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये


                                                                                                                        - गिरीश महाज


            मुंबई, दि. १ : आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता - सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जात असतात, यामध्ये विविध दिंड्यांचाही सहभाग असतो.पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी मुक्काम केला जातो. या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे.


            पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज या प्रमुख पालख्यांचा प्रवास जवळपास २२ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असतो. वारकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.


ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये


            सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून जाणार आहे, त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचातींवर असणार आहे.


पुणे जिल्हा परिषदेला १७ कोटी ६४ लाख रुपये निधीस मान्यता


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या निधी मधून संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे यांनी चालू वर्षात आषाढी वारीनिमित्त शासनास सादर केलेल्या १७ कोटी ६४ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

हृदयाची दुर्बलता*

 *हृदयाची दुर्बलता*


◼️तुळशीच्या बियांचे अर्धा ते एक ग्रॅम चूर्ण तेवढ्याच खडीसाखरेबरोबर घेतल्याने किंवा मेथीच्या २० ते ५० मि.ली. काढ्यात (२ ते १० ग्रॅम मेथी १०० ते ३०० ग्रॅम पाण्यात उकळावी) मध घालून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️अर्जुनसालीचे १ चमचा चूर्ण व दोन चमचे धने पूड, १ ग्लास पाण्यात उकळून घ्यावे. प्यायल्याने खूप लाभ होतो. याशिवाय लसूण, आवळा, मध, आले, बेदाणा, द्राक्षे, ओवा, डाळींब इ. पदार्थांचे सेवन हृदयासाठी लाभदायक आहे.


◼️लिंबाच्या सव्वा तोळा (सुमारे १५ ग्रॅम) रसात आवश्यकतेनुसार खडीसाखर घालून प्यायल्याने हृदयाचे स्पंदन सामान्य होते तसेच स्त्रियांमध्ये हिस्टेरियामुळे वाढलेली हृदयाची धडधडदेखील दोन लिंबांचा रस पाण्यात घालून प्यायल्याने शांत होते.


◼️गुळवेलीचे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने किंवा आल्याचा रस व पाणी समप्रमणात एकत्र करून प्यायल्याने हृदयरोगात लाभ होतो.


◼️उगवत्या सूर्याच्या शेंदरी किरणांमध्ये (सुमारे दहा मिनिटेपर्यंतच्या) हृदयरोग दूर करण्याची अपरिमीत शक्ती असते. म्हणून रुग्णाने प्रातःकाळी सूर्योदयाची वाट पहावी आणि सूर्याचा पहिला किरण त्याच्यावर पडेल असा प्रयत्न करावा.


◼️मोठ्या गाठीच्या हळकुंडाची वस्त्रगाळ पूड करून आठ महिने ठेवून द्यावी. नंतर दररोज देशी गाईच्या दूधतून किंवा तुपातून एक चमचा घालून प्यावी. हळदीत हा खास गुण आहे की ती रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले रक्ताचे थर विरघळविते आणि रक्तवाहिन्या साफ करते. जेव्हा रक्तवाहिन्या साफ होतात तेव्हा तो कचरा म्हणजेच विजातीय द्रव्ये पोटात गोळा होतात व नंतर मलावाटे बाहेर टाकली जातात.


◼️रोहिणी हिरड्याचे वस्त्रगाळ चूर्ण करून ठेवून द्यावे. रोहिणी हिरडा न मिळाल्यास बेहड्याच्या आकाराचा कोणताही हिरडा घ्यावा. या हिरड्याचे सुमारे १ चमचा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईच्या दुधातून किंवा तूपाबरोबर घ्यावे. यामुळे विजातीय द्रव्ये मल, मूत्र व घाम इ. रूपात शरीरातून बाहेर टाकली जातात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



आय आय टी कानपूर उपक्रम

 फारच छान...You may like to save this and, if found interesting & informative, forward it to all your like-mind


ed contacts 🙏

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे.....?*

 शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे.....?* 

*

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. 


*माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते अशावेळी...*

*मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.


*आहारात सिझनल फळांचा समावेश करा.


*गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,


*राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.


*सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे


*सुकामेवा शेंगदाणे खावे, 

अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा.


*सुनील इनामदार.*



🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺

*

Featured post

Lakshvedhi