Wednesday, 3 May 2023

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            मंत्रालयात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित यावेळी उपस्थित होते.


            पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, उपलब्ध आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंपांच्या योजनेसाठी एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी सौर उर्जा, माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी सौर ऊर्जा आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. बँकेमार्फत सुरू असलेल्या एमयुटीपी प्रकल्पाच्या कामाबद्दल शिष्टमंडळाने यावेळी समाधान व्यक्त केले.


०००० 


 

कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती

 कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती


            कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल.


            वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE च्या २०० च्या आतील किंवा QS – Quacquarelli Symonds रँकिंग १५० च्या आतील) परदेशी शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. मरिन सायन्स, मरिन इकॉलॉजी, ओशोनोग्राफी, मरिन बायोलॉजी, मरिन फिशरीज, मरिन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सीटी या अभ्यासक्रमांसाठी १५ पदव्युत्तर पदवी आणि १० पीएच.डी. अशा दरवर्षी २५ शिष्यवृत्ती दिल्या जातील. पदव्युत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे वय कमाल ३५ वर्षे आणि पीएचडीसाठी कमाल वय ४० वर्षे असावे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी ३१ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात कांदळवन प्रतिष्ठानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.


---

--०-----


वैद्य विनायक खडीवाले

 वैद्य विनायक खडीवाले


शहरी संस्कृतीचा प्रभाव म्हणून स्त्री-पुरुषांच्या गुडघ्याचे विकार वाढत आहेत. शेतमजूर, कामगार, ओझेवाले, हमाल यांच्या गुडघ्याचे विकार आपण समजू शकतो; पण शहरांमध्ये जिने चढ-उतार, उभ्याचा ओटा, जमिनीवर बसून काम करण्याची बंद झालेली सवय, फाजील चहा-पाणी आणि अवेळी खाणे यामुळे गुडघ्यांच्या हाडांच्या सांध्यावर दाब पडतो. तेथील ‘वंगण’ कमी होते. गुडघ्यांच्या आतील बाजूला सूज येते, कटकट आवाज येतो, उठा-बसायला विलक्षण त्रास होतो. काहींना शौचास बसायला फार कष्ट होतात. याच विकाराला सामान्य माणूस गुडख्यात पाणी झाले असे म्हणतात.


पा

श्‍चात्य वैद्यकात पाणी काढणे या उपायाचे किंवा गुडघ्यात इंजेक्शन देणे याचे मोठे बंड माजले आहे; पण त्यामुळे गुडघ्यात पाणी पुन: पुन्हा होणारच. गुडघ्यातील हाडांची सूज कमी व्हावी, दुखणे कमी व्हावे आणि नेहमीच्या उठ-बसमध्ये चालण्यात व्यत्यय येऊ नये, याकरिता प्रथम नेमक्या दुखण्याच्या जागी चार लेपगोळ्यांचा दाट आणि गरम लेप लावावा. त्याकरिता प्रथम त्या गोळ्या पाण्यात भिजवाव्या नंतर पाट्यावर वाटून मग पळीत दाट गरम लेप लावावा. त्याशिवाय बलदायी महानारायण तेल सकाळी आंघोळीपूर्वी व रात्री झोपण्यापूर्वी गुडघ्याला व पायाला खालून वर असे जिरवावे. लाक्षादिगुग्गुळ, त्रिफळागुग्गुळ, गोक्षुरादिगुग्गुळ, सिंहनादगुग्गुळ, प्रत्येकी तीन गोळ्या, बारीक करून पाण्याबरोबर घ्याव्या. स्थौल्य जास्त असल्यास सोबत आरोग्यवर्धिनी घ्याव्यात. 


पांडुता आणि गुडघ्यावरील सूज जास्त असल्यास चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी या दोन गोळ्या इतर चार गोळ्यांबरोबर द्याव्या. गुडघ्याच्या तक्रारींबरोबर पाठ, कंबरदुखी असल्यास संधिवातारी, आणि गणेशगुग्गुळ ही जादा औषधे सकाळ इतर चार गोळ्यांबरोबर घ्याव्या. अशक्तपणा असल्यास आस्कंदचूर्ण 1 चमचा घ्यावे. मलावरोध असल्यास गंधर्वरीतकी घ्यावे. 


विशेष दक्षता 


गुडघ्याच्या हाडाच्या वाटीची आणखी झीज होणार नाही आणि झालेली झीज भरून यावी म्हणून योजना हवी. तसेच फाजिल वजन वाढू नये आणि सूज कमी व्हावी म्हणून लेखनीय औषधे आणि नेमके व्यायाम योजावे. माफक प्रमाणात तूप, उडीद, डिंक, गहू, मूग, सात्विक आहार, लसूण, पुदिना, आले असी चटणी, स्निग्ध आणि किंचित उष्ण असा संतुलित आहार घ्यावा. खारट, आंबट, तिखट आणि आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड, दही, शिळे अन्न, पाव, फरसाण, इडली, डोसे, कोल्ड्रिंक, कृत्रिम पेये वर्ज्य करावे. कटकट आवाज येत असल्यास गुडघ्यांना पूर्ण विश्रांती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरेकी जिने चढ-उतार आणि खूप वजन उचलणे वर्ज्य करावे



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात 7 मोठे फायदे.

 जीऱ्याचे पाणी पिण्यामुळे मिळतात 7 मोठे फायदे

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.


 जीरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते. जिरे पाणी पिण्यामुळे वजन कमी होते त्याच सोबत अनेक फायदे मिळतात. चला पाहू जीरा पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत.


1. बद्धकोष्ठता : 

जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो.


2. वजन कमी करतो : 

जीऱ्यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढते. ज्यामुळे शरीरातून चरबी कमी होते.


3. हार्ट अटैकचा धोका कमी करतो : 

जीरा पाणी शरीरातील फैट आणि कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रोलची कमी हार्ट अटैकचा धोका कमी करण्यास मदत होते.


4. मासपेशीच्या वेदना पासून आराम : 

जीरा पाणी शरीरातील रक्त संचार वाढवतो. यामुळे मासपेशीच्या वेदना कमी होतात. आणि शरीर थकण्या पासून वाचवतो.


5. इम्यूनिटी सिस्टम मजबूत करतो : 

रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असेल तरच आजारा पासून बचाव होतो. जीऱ्याच्या पाण्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. आयर्न आपली रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. याच सोबत जीऱ्यामध्ये विटामिन ए आणि सी असते. यामुळे इम्युनिटी लेवल वाढते.


6. एनीमिया दूर करण्यास मदत करते : 

रक्ताची कमी एनिमिया रोग असतो. याचा उपाय जीऱ्याच्या पाण्याने केला जाऊ शकतो. जीऱ्यामध्ये आयरन भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे एनिमियाची समस्या देखील दूर होऊ शकते. जर शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर नियमितपणे जीऱ्याचे पाणी सेवन करावे.


7. झोपेची समस्या दूर करतो : 

झोपेची समस्या वजन वाढल्यामुळे होते. वजन वाढल्यावर झोपेची समस्या होणे सामान्य आहे. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जीऱ्याचे पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.



 सुनिता सहस्त्रबुद्धे


*⭕️

झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत

 झाडाची मुळे हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहेत


   1) *एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.*

 याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील.

 म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे.

   2) *एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.*

 आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली.

 वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. 

याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.      

   *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.* आपण एका बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. 

एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.

पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'.  


 🌳🌴🪴🍀🌿🌱🌳 🙏🙏 *झाडाचे महत्व जाणाल तर तुमचं महत्व वाढेल.* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 


*झाडे लावा निसर्ग वाचवा*

 🙏🙏🙏

सुरक्षा स्वतची

 सुरक्षा स्वतचं स्वतः घ्यावी.🙏🙏 जेष्ठ नागरिक यांनी घरातून बाहेर जाताना केवळ मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनींग वॉकच नव्हे तर प्रत्येक वेळी, एकटे किंवा आपल्या पत्नीसह, किंवा जेष्ठ नागरीकां सोबत आपल्या आधारासाठी व त्यापेक्षाही स्वतःच्याच संरक्षणासाठी आपले सोबत Walking stick, किंवा 4 फूट ते 5 फूट लांबीची जाड मजबूत काठी न चुकता सोबत बाळगावी. जेणेकरून कोणत्याही लहान मोठया प्रसंगात (आपत्तीत ) उपयोगी पडेल. From: - *मधुकर शेंबडे* "आपत्ती व्यवस्थापन ,वहातूक व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा विषयाचा अभ्यासक व प्रशिक्षक महाराष्ट्र पोलीस सातारा 9423260251


शासन व जन हितार्थ 

उन्हाळ्यात दिवसातून कितीवेळा अंडी खावी? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात.....*

 *उन्हाळ्यात दिवसातून कितीवेळा अंडी खावी? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात.....*


उन्हाळा सुरु झाला आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे शरीराची लाही लाही होत आहे. अशा हवामानात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या ऋतूमध्ये पोटाच्या समस्या जास्त होतात. उन्हाळ्यात तोलून मापून अन्न खावं लागतं. अशातच उन्हाळ्यात अंडी खावी का असा प्रश्न पडतो. त्यात अंडी खाणे बहुतेक लोकांचा हा आवडता नाश्ता असतो. आरोग्य तज्ज्ञ न्याहारीमध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात.तसेच फिटनेस फ्रेकदेखील प्रोटिन्स मिळविण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करतात. एकूणच अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे स्नायूंच्या विकासापासून शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरते. पण आता प्रश्न असा आहे की दिवसात किती अंडी खावीत, रोज अंडी खाणे सुरक्षित आहे का? तुमच्याया या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही सांगणार आहोत.


*एका दिवसात किती अंडी खाणे योग्य आहे...?*

तज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीने दररोज दोन ते तीन अंडी खाणे आवश्यक आहे. निरोगी लोक आठवड्यातून ७ ते १० अंडी खाऊ शकतात. जे खेळाडू आहेत किंवा जे जीम, वर्कआउट करतात, त्यांना जास्त प्रोटीनची गरज असते त्यामुळे ते दिवसातून चार ते पाच अंडी खाऊ शकतात. जे लोक रोज अंडी खातात त्यांनी अंड्याचा पांढरा भागच खावा. याशिवाय जर कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी दिवसात दोनपेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंड्याचे सेवन कमी करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


*अंड्यातील पिवळा भाग खाल्ल्याने पडाल आजारी...*

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत. कारण, कमी शिजवलेल्या अंड्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अंड्याच्या बाहेरील आणि पिवळ्या भागात साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात. जे तुम्हाला आजारी बनवू शकते. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांनी अंडी खाणे टाळले पाहिजे. पण तरीही जर तुम्ही त्यातील पिवळा भाग काढून खाल्लात तर त्यातून नुकसान होण्याची शक्यता कमी असते. कारण पिवळ्या भागात फॅट असते, ज्यामुळे हाय बीपी असलेल्या व्यक्तीला त्रास होतो. ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात अंड्यांचा समावेश करावा. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते आणि त्यामुळे तुमचे पोटही खराब होऊ शकते.


*अंडी खाण्याचे फायदे...


*अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.


*वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.


*अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात.


*अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.


कोणताही उपाय वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Featured post

Lakshvedhi