Sunday, 8 January 2023

खास टिप्स जेष्ठ साठी

 🌹ज्येष्ठांसाठी खास टिप्स म्हणजे 40/50/60 वयाचे🌹

१- पहिली सूचना: तुम्हाला तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या,आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतांश शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात.दररोज किमान 2 लिटर.

२- दुसरी सूचना: शरीराकडून जास्तीत जास्त काम करवून घ्या , शरीराची हालचाल झाली पाहिजे, जसे की चालणे,पोहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळाने.

३-तिसरी टीप: कमी खा.जास्त खाण्याची लालसा सोडून द्या.कारण ते कधीच चांगले आणत नाही. स्वत: ला वंचित करू नका, परंतु प्रमाण कमी करा.प्रथिने, कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ जास्त वापरा.

४- चौथी सूचना: अगदी आवश्यक असल्याशिवाय शक्यतो वाहन वापरू नका. तुम्ही कुठेही किराणा सामान घेण्यासाठी,कोणाला भेटायला किंवा काही कामासाठी जात असाल तर, पायावर चालण्याचा प्रयत्न करा.लिफ्ट,एस्केलेटर वापरण्या ऐवजी पायऱ्या चढा.

५- पाचवी सूचना राग सोडा, काळजी करणे थांबवा, गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्रासदायक परिस्थितीत स्वत: ला गुंतवू नका, ते सर्व आरोग्य खराब करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात. सकारात्मक लोकांशी बोला आणि त्यांचे ऐका. ६- सहावी सूचना सर्वप्रथम पैशाची आसक्ती सोडून द्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधा, हसवा आणि बोला! पैसा जगण्यासाठी बनवला गेला आहे,पैशासाठीआयुष्य नाही.

७-सातवी टीप स्वत:बद्दल, किंवा तुम्ही जे साध्य करू शकले नाही अशा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकत नाही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका.त्याकडे दुर्लक्ष करा आणि विसरा.

८- आठवी सूचना पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता, सौंदर्य, जात आणि प्रभाव;या सगळ्या गोष्टी अहंकार वाढवतात.नम्रता ही लोकांना प्रेमाने जवळ आणते.

 ९- नववी टीप जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही. ही एका चांगल्या जीवनाची सुरुवात आहे. आशावादी व्हा, स्मृतीसह जगा, प्रवास करा, आनंद घ्या.आठवणी निर्माण करा!

१०- दहावी सूचना तुमच्या लहान मुलांना प्रेमाने, सहानुभूतीने आणि आपुलकीने भेटा! काही उपहासात्मक बोलू नका! चेहऱ्यावर हसू ठेवा!तुम्ही भूतकाळात कितीही मोठे पद भूषवले असले तरी ते वर्तमानात विसरून जा आणि या सर्वांशी मिळून मिसळून रहावे!हरी 🕉️

 🌹जेष्ठ सेवानिवृत्त एन्जॉय ग्रुप पुणे शहर🌹

Saturday, 7 January 2023

लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेनेराज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे

 लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेनेराज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे

                                    - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

        मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु उद्योग जगत व कॉर्पोरेट्सच्या सहकार्याशिवाय अर्थपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देता येणार नाही. या दृष्टीने लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करावे असे आवाहन करताना औद्योगिक क्षेत्रातील या समूहाचा प्रत्यक्ष अनुभव युवकांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.    


            राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने आयटीआय प्रशिक्षकांसाठी आयोजित कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप संस्थेच्या मढ आयलंड, मुंबई येथील अकादमीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लार्सन अँड टुब्रोचे समूहाचे अध्यक्ष ए.एम.नायक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. रामकृष्णन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शहाणे, प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख बी.ए.दमाहे, मास्टर ट्रेनर लार्सन अँड टुब्रो प्रिया सावंत, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी तसेच संस्थेत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करीत असलेले राज्यातील आयटीआय प्रशिक्षक उपस्थित होते.


            लार्सन अँड टुब्रो हे देशाच्या उद्योग जगतातील एक प्रेरणादायी नाव आहे. समूहातर्फे केलेल्या प्रत्येक कार्यात गुणवत्ता असते असे सांगून एल अँड टी समूहाने देशातील अनेक राज्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण संस्था उभाराव्या व इतर उद्योग समूहांनी देखील युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.


श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे : ए एम नायक


            समाजात पांढरपेशा नोकऱ्यांना मान आहे परंतु श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानले जाते ही मानसिकता बदलली पाहिजे, असे प्रतिपादन एल अँड टी चे समूह अध्यक्ष ए.एम.नायक यांनी यावेळी केले.


            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे व कौशल्याच्या माध्यमातूनच देशाला आत्मनिर्भर बनविता येऊ शकते. देशाला कौशल्य राजधानी बनविण्याच्या दृष्टीने मात्र अजूनही फार मोठे कार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.


            एल अँड टी समूहाने मुंबई येथे सन २०२१ साली अत्याधुनिक सुविधा असलेली कौशल्य प्रशिक्षक अकादमी सुरु केली असून त्याठिकाणी एल अँड टी मधील अनुभवी लोकांना अध्यापक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे असे त्यांनी नमूद केले.   


            आतापर्यंत अकादमीने महाराष्ट्र शासनाच्या १ हजार ७ आयटीआय प्रशिक्षकांना या संस्थेत प्रशिक्षण दिले असून या कौशल्याचा समाजात सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.    


            लार्सन अँड टुब्रोने आपल्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत स्थापन केलेल्या लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक अकादमी अंतर्गत १ हजार आयटीआय प्रशिक्षकांचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


*****


L & T Skills Trainers Academy complete straining 1000 ITI instructors


Maharashtra Governor, L & T Chairman attend Festival of Skills.

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the concluding session of 'Kaushal Utsav', a festival of skills organised by L & T Skill Trainers Academy at Madh Island of Mumbai on Sat (7 Jan). The Kaushal Utsav was organised by L & T to mark the completion of 5 days of specizlied training of 1000 trainers of Industrial Training Institutes from Maharashtra at its training facility in Mumbai.  


      Group Chairman of L & T A.M. Naik, Vice Chancellor of Maharashtra State Skills University Dr Apoorva Palkar, CE of L &T Skill Development Mission K. Ramakrishnan, Dy CE Ashok Shahane, Director of the Academy B A Damahe, Master Trainer L&T Priya Sawant, Trainers and ITI Instructors completing 5 days skills training were present.


      Complimenting L & T for starting the Skill Trainers Academy the Governor called upon L & T to work closely with the Maharashtra State Skills University started by the Government of Maharashtra. He further appealed to L & T to open more such skill training academies all over the country to realize the Prime Minister's goal of making India the skill capital of the world.  


      The L & T Skill Trainers Academy, a CSR initiative of L & T, organised the Skills Festival in collaboration with the Directorate of Vocational Education and Training, Government of Maharashtra.


*****


 

 

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर.

 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य

सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर.

            मुंबई, दि. ७ : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सैयद शहजादी या ८ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.


            या दौऱ्याच्या कार्यक्रमात ते अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीची पाहणी करतील. तसेच अल्पसंख्याक समाजाला भेडसावणाऱ्या तक्रारी, प्रश्नांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री यांचा १५ कलमी कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक घेऊन चर्चा करतील.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज हिंगोली दौर्‍यावर.

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज हिंगोली दौर्‍यावर.

मुंबई : ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज चे अध्यक्ष ललित गांधी हे रविवारी (ता. ८) रोजी हिंगोली जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.


मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँण्ड कॉमर्स संलग्नित हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ व्दारा आयोजित ८ जानेवारीला भव्य मराठवाडा व्यापारी महापरिषद होत आहे. हिंगोली येथील रामलीला मैदान, महावीर भवनात सकाळी साडेदहा वाजता होत असलेल्या या महापरिषदेसाठी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र चेंबरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यात उद्योग व व्यापार वाढून पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटनासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक आणि व्यापारी यांच्यासोबत ते संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र चेंबरचे हिंगोली जिल्ह्यातील उद्योजक व व्यापारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सायबर क्राईम सतर्क राहा


 

सावधान इंडिया


 

Jai हो गणितज्ञ शंभु राजे

 


Featured post

Lakshvedhi