Wednesday, 13 April 2022

 मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन.

            मुंबई, दि. 12 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने पुराभिलेख संचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचे १३ एप्रिल रोजी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे.

            देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने राज्यभर सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुराभिलेख संचालनालयामार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील महत्त्वपूर्ण घटना असणाऱ्या अभिलेख व छायाचित्रांचे चित्रण प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनास सर्वसामान्य नागरिक आणि इतिहासाचे अभ्यासक तसेच वाचक वर्गाने भेट द्यावी, असे आवाहन पुराभिलेख संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

 उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा

- राजेश टोपे

            मुंबई, दि. 12 :- राज्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊ नये, उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

            वातावरणातील बदल व मानवी जीवन यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आयुक्त रामास्वामी एन. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यातील वाढत्या तापमानामुळे उष्माघात, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभाग आणि हवामान खात्याने योग्य समन्वय राखून माहितीचे आदान-प्रदान करावे. यामुळे वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होण्यास मदत होईल. उष्माघाताचे प्रमाण वाढू नये, तापमान वाढीमुळे वाढणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. जनजागृती करावी. आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, हवामान खाते आदी विभागांनी सतर्क राहून समन्वय ठेवावा, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

000000




 मुंबईतील रेडिओ वरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा

- सुभाष देसाई

 

            मुंबई दि. 12आकाशवाणीदूरदर्शनसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी प्राइम टाइममध्ये (महत्वाच्या वेळेत) मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्याने स्थान द्यावेमुंबईतील रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. दृक श्राव्य माध्यमातील प्रतिनिधींची बैठक आज मंत्रालयात मंत्री श्री.देसाई यांच्या दालनात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            श्री. देसाई म्हणालेराज्यात मराठी भाषेतील कार्यक्रम सुरु राहणे आवश्यक आहे. आकाशवाणीसह विविध खासगी रेडिओ वाहिन्यांवरील मराठी कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेक मराठी कार्यक्रम हद्दपार झाले आहेत. या ठिकाणी हिंदीइंग्रजी कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. यापुढे आकाशवाणीने मराठी कार्यक्रमांची संख्या वाढवावीखासगी रेडिओंनी देखील किमान दोन तास मराठी कार्यक्रम प्रसारित करावेतअसेही श्री. देसाई म्हणाले.

            मराठी वाहिन्यांवरून मराठी कार्यक्रम हद्दपार होत असल्याची बाब माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही निदर्शनास आणून दिली. यावेळी श्री. देसाई यांनी संबंधित रेडिओ वाहिन्यांना मराठी भाषेतील कार्यक्रम प्राधान्याने प्रसारित करण्याची सूचना केली. सध्या एफएम वाहिनी, एफ एम गोल्ड वाहिनीवरील मराठी गाण्यांचे कार्यक्रम बंद झाले आहेत. काहींचा वेळ कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे हिंदी कार्यक्रमांचे दिल्लीवरून प्रसारण  होत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली.

            याबाबत सर्व रेडिओ प्रमुख आणि आकाशवाणीच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली जाईलअसे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी मनोहर पावनीकर ( आकाशवाणी)कपिलकुमार ढोरे ( दूरदर्शन)शीवल देसाई ( रेडिओ सिटी एफ एम)रिमा अमरापूरकर ( रेडिओ मिर्ची)मयुर शिंगटे ( रेडिओ फिवर)संतोष क्षत्रिय ( एच. टी. मीडीया) आदी उपस्थित होते.

००००


 गुणवंत कामगार पुरस्कारांचे 19 एप्रिलला वितरण

            मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे 34 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून येत्या 19 एप्रिल 2022 रोजी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

            मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे मंगळवार, दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हा समारंभ होणार असून सन 2019 मधील कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार व गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारर्थींना सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमास कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्यासह कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव , कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची उपस्थिती असणार आहे.

            कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत कामगार त्याचप्रमाणे कामगार भूषण पुरस्कारासह गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

             या कार्यक्रमास जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.

000

 *The day you stop worrying about what people think about you, is the day you start living your life.*

*Let them do the thinking & you do the living*


 *Good morning!! Have a pleasant day ahead* 😊

 *आप सही हैं तो*

         *आपको गुस्सा होने की जरूरत ही नहीं,*

                    *और*

  *आप गलत है तो आपको*

          *गुस्सा होने का कोई*

               *हक नहीं है!*

     *आज से हम गुस्से का त्याग करें*

        *और मन शांत रखें*                                                               

*_!! स्वदेशी अपनायें-देश बचायें !!_*🇮🇳🇮🇳🇮🇳

*_!! आयुर्वेंद अपनायें-निरोगी स्वस्थ जीवन पायें !!_*

🌹 *सुप्रभात* 🌹

 *नोक्टुरिया*

ज्येष्ठ नागरिकांसाठी.. खरे तर सर्वांसाठी! 

लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे.. ! 

 

 नॉक्टुरिया म्हणजे रात्री लघवी होणे *हे हृदयाच्या विफलतेचे* लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.

 शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे.  याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.  झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात.  पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं.  त्यांना काय माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे हे प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये वारंवार पहाटे *हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे एक महत्त्वाचे कारण* आहे.

  खरं तर, नॉक्टुरिया म्हणजे वारंवार लघवी होणे ही मूत्राशय बिघडल्याची  समस्या नाही.  हे वयोमानानुसार वृद्धांमध्ये हृदयाचे कार्य कमी झाल्यामुळे होते, कारण हृदय शरीराच्या खालच्या भागातून रक्त शोषण्यास (पुरेसे पंपिंग) सक्षम नाही.

 अशा स्थितीत दिवसा जेव्हा आपण उभे असतो तेव्हा रक्ताचा प्रवाह अधिक खालच्या दिशेने होतो.  हृदय कमकुवत असल्यास हृदयातील रक्ताचे प्रमाण अपुरे पडते आणि शरीराच्या खालच्या भागावर दाब वाढतो.  म्हणूनच प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना दिवसा शरीराच्या खालच्या भागात सूज येते.  जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागाला दाबातून आराम मिळतो आणि त्यामुळे ऊतींमध्ये भरपूर पाणी साठते.  हे पाणी पुन्हा रक्तात येते.  जास्त पाणी असल्यास, पाणी वेगळे करण्यासाठी आणि मूत्राशयातून बाहेर ढकलण्यासाठी मूत्रपिंडांना अधिक मेहनत करावी लागते.  हे नॉक्टुरियाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

 त्यामुळे तुम्ही झोपायला आडवे झाल्यावर आणि पहिल्यांदा टॉयलेटला जाता तेव्हा साधारणतः तीन ते चार तास लागतात.  त्यानंतर, जेव्हा रक्तातील पाण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागते, तेव्हा तीन तासांनंतर पुन्हा लघवीला जावे लागते.

 आता प्रश्न असा पडतो की ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका हे महत्त्वाचे कारण का आहे?

 दोन-तीन वेळा लघवी केल्यावर रक्तात फारच कमी पाणी असते, तसे  श्वासोच्छवासानेही शरीरातील पाणी कमी होते.  यामुळे रक्त घट्ट आणि चिकट होते आणि झोपेच्या वेळी हृदयाची गती मंदावते.  जाड रक्त आणि संथ रक्तप्रवाहामुळे, अरुंद रक्तवाहिनी सहज अवरोधित होते...

 यामुळेच प्रौढ आणि वृद्ध लोकांना नेहमी पहाटे ५-६ च्या सुमारास हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू झाल्याचे आढळून येते.  या अवस्थेत ते झोपेतच मरतात.

 सगळ्यांना सांगायची पहिली गोष्ट म्हणजे नॉक्टुरिया ही मूत्राशयाची खराबी नाही, ती वृद्धत्वाची समस्या आहे. म्हणून शक्य झाले तर पायाचा भाग उंचावर राहील अशा पध्दतीने झोपावे.. उठावे लागले तरी पाणी प्यायचे टाळू नये..

खरे तर गोष्ट झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे आणि रात्री उठल्यावर पुन्हा लघवी झाली की पुन्हा पाणी प्यावे!

 नॉक्टुरियाला घाबरू नका.  भरपूर पाणी प्या, कारण पाणी न पिल्याने तुमचा जीव जाऊ शकतो..

 तिसरी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही सामान्य वेळेत जास्त व्यायाम केला पाहिजे. 

 मानवी शरीर हे यंत्र नाही की त्याचा अतिवापर केला तर बिघडेल, उलट त्याचा जितका जास्त वापर केला जाईल तितका तो मजबूत होईल.  अस्वास्थ्यकर अन्न खाऊ नका, विशेषतः जास्त स्टार्च आणि तळलेले पदार्थ टाळा!

  हा लेख तुमच्या प्रौढ आणि वृद्ध मित्रांसोबत शेअर करा. घरातील जाणत्या तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना पाणी प्यायचा सल्ला द्या!

*वारंवार उठावे* लागते म्हणून पाणी प्यायचा कंटाळा तुम्हास हृदय घात किंवा लकवा भेट देऊन *कायमचे उठवू शकते*  म्हणून रात्री किंवा दिवसा देखील पाणी प्यायचे टाळू नका!

Featured post

Lakshvedhi