Tuesday, 8 March 2022

 मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना कोठे काय काय खरेदी कराल ?

पेण : गावामध्ये झिंगा (कोळंबी) भाकरी, कलिंगड , पांढऱ्या कांद्याच्या माळा, पोहे मिरगुंड, पापड.

इंदापूर : गावठी पोहे, तांदूळ, वेलवांगी.

महाड: वटवाघूळ तेल ( वातनाशक )

परशुराम घाट : जेवण ( हॉटेल ओमेगा)

चिपळूण: जेवण (अभिषेक हॉटेल)

संगमेश्वर : मोहनथाळ, (संगमेश्वरी खाजा) गणेशकृपा चे मोदक.

निवळी घाट: जेवण (ग्रीन पार्क हॉटेल)

हातखंबा: HP पंपावर गद्रे यांची बेस्ट फ्रोझन फिश प्रॉडक्टस व मॉलमध्ये शॉपींग.

लांजा: व्हेज नॉनव्हेज जेवण, सरसचे शेंगदाणा लाडू व इतर उत्पादने.

राजापूर: ठाकूर बेकर्सची स्पेशल नान-कटाई व इतर बेकरी प्रॉडक्टस.

कणकवली:- सकाळी ताजे मासे, ब्रेकफास्ट, मालवणी खाजा व खडके लाडू, बाळा सावंतचो कटवडो 

सावंतवाडी :- माशांचे जेवण,ताजा मालवणी खाजा, शोभेची फळे. सकाळी सुरंगीचे गजरे, स्थानिक भाजी, आबोलीचे वळेसर, नारळ आणि पुराणिक फूड्सची प्रसिद्ध गुळापासून बनविलेली स्पेशल कोकोनट बर्फी आणि मॅंगो कोकोनट बर्फी

पुढे गोव्यात :

म्हापसा : म्हापशाच्या बाजारात मडक्यात मिळणारी हुर्राक, फेणी, काजूगर,

एकदा अवश्य भेट देऊन खरेदी करा व आनंद घ्या...

 सहज गंमत...

*बायकांकडून नवऱ्यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे.....*

न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का? विचारलं.

रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये.”*

त्या माणसाला काही कळलं नाही. त्याने परत विचारलं.

रमाबाई म्हणाल्या, *“जोडेही दिसत नाहियेत."*

तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं.

रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."*

*ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.*

नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी.

*का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्‍याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी”* असा होऊ लागला.

मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा करु लागला.

*का. पु. स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*.

*का. पु. स.* ..... नवर्‍याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं.

याशिवाय *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चालु होताच .....

*का. पु. स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *रितसर नावाने किंवा माझा नवरा* असा होऊ लागला.

*का.पु.स.* ..... नवर्‍याचा उल्लेख *बंड्या, खंड्या, निल्या, मित्या* असा यायाकारी होऊ लागला.

*का. पु. स* ...... *सिरिअल्स* मधुन आणि कुठे कुठे प्रत्यक्षातही *शोना, बच्चु,पिलु,डार्लिंग, बेब, Hb, हब्बी, हब्बुडी* असा होऊ लागला.    

या सगळ्याला मागे टाकील असा एक अति लडिवाळ उल्लेख हल्ली वरचेवर आढळायला लागलाय तो म्हणजे *नवरू* ..... 

अगदी नारू म्हटल्यासारखं वाटतं आणि, *"नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा"* किंवा *"पाणी गाळा नारू टाळा"* अशा भिंतीवर लिहिलेल्या जाहिराती डोळ्यासमोर तरळायला लागतात.😀

पण सर्वात धडकी भरवणारी हाक म्हणजे.. *अहो..ऐकलत का* याला अजुन तोड नाही.

असा हा नवरे जमातीचा इतिहास.......

🙏🙏

एका माणसाने शेतक-याच्या बायकोला "नवरा घरी आहे का?"

अशी विचारणा केली. बायको रमाबाईंची फॅन असावी ....

तिने सांगितले *"बैल शेतातून अजून परतला नाही".*

*☹️😀🤣👍🙏🤣🤣🤣🤣*

जागतिक महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🌷🌷🌺🌺

 *आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची निवड झाली आहे!*

  भारताचा मोठा विजय!!!  

*पंतप्रधान मोदींची चाणक्य कूटनीति. जागतिक मंचावर ब्रिटनचा पराभव. पंतप्रधान मोदीजींनी जगभरात कसे संबंध विकसित केले याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.* न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे. *भारताचे न्यायमूर्ती दलवीर सिंग यांना 193 मतांपैकी 183 मते मिळाली (प्रत्येक देशातून एक) आणि त्यांनी ब्रिटनच्या न्यायमूर्ती ख्रिस्तोफर ग्रीनवुडचा पराभव केला. ब्रिटनची या पदावरील 71 वर्षांची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली.*

  हे साध्य करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय गेल्या ६ महिन्यांपासून प्रयत्नशील आहे! सर्व 193 देशांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांना सहज जिंकण्याची खात्री असलेल्या ब्रिटीश उमेदवाराबाबत भारताची भूमिका समजावून सांगणे हे फार कठीण काम होते. * मतदानाच्या 11 फेऱ्यांमध्ये, न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांना महासभेत 193 पैकी 183 मते मिळाली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 15 पैकी सर्व 15 सदस्य.

  न्यायमूर्ती दलवीर भंडारी हे 9 वर्षांच्या कार्यकाळासाठी हे पद सांभाळतील. *भारताला मत देणारे हे 183 देश " स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर आपले पंतप्रधान मोदीजींनी जगभरातील देशांशी किती विनम्र, आदरयुक्त आणि उत्तम संबंध निर्माण केले याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.*

  ️विनंती - आवडल्यास तुमच्या इतर मित्रांनाही पाठवा

  *जय हिंद-जय भारत.*

 वृत्त क्र. 733विधानपरिषद प्रश्नोत्तरे:

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची

संयुक्त समिती गठीत करणार

- परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

            मुंबई, दि.8 : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमण्यात यावी अशी सूचना केली. या समितीमध्ये सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, मंत्री, विरोधी पक्षनेते यांचा समावेश असावा. असेही त्यांनी सूचित केले. याबाबत येत्या आठवड्याभरात समिती गठीत करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत दिली.

            सदस्य डॉ. परिणय फुके यांनी राज्य परिवहन मंडळाची बससेवा सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री ॲड. परब बोलत होते.

            परिवहन मंत्री ॲड परब म्हणाले, एसटी कर्मचारी संपावर गेले असल्याने बससेवा विस्कळीत झाली असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मचारी कामावर नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. हळुहळु कर्मचारी कामावर येत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी एसटी सेवा प्राधान्याने विद्यार्थ्यांसाठी सुरु करीत आहोत.

            शासनाने आपली भूमिका वारंवार जाहीर करुनही दिवाळीपूर्वी 19 युनियननी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्याबाबत तात्काळ कृती समितीची बैठक घेवून शासनाच्या महागाई भत्त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 12 टक्केवरुन 28 टक्के करुन तफावत दूर केली. तसेच दोन ते तीन टक्के पगारवाढ करण्यात आली. घरभाड्याचा विषय होता, तोही शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जाहीर करण्यात आला. दिवाळीमध्ये नगारिकांचे हाल होऊ नये म्हणून न्यायालयात सकारात्मक बाजू मांडली. न्यायालयाने आदेश देवूनही कर्मचारी संपावर गेले. विलीनीकरणाबाबत त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीला बारा आठवडयांची मुदत देण्यात आली होती. त्रिस्तरीय समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही असे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात आली. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत पगारवाढही देण्यात आली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्याबाबत वारंवार आवाहन केले गेले. तरीही कर्मचारी कामावर रुजु झालेले नाहीत. यामुळे जनतेला त्रास होत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर होणारी कारवाई चारवेळा मागे घेतली. कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आम्ही चर्चा करुन प्रश्न सोडविण्यास तयार आहोत. याबाबत शासनाचे सहानभूतीपूर्ण धोरण आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहनही परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले.

            यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.

 महिला दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते ‘कमला पॉवर विमेन पुरस्कार’ प्रदान

· अभिनेत्री सुहास जोशी सन्मानित

            मुंबई, दि. 32 :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील 38 कर्तृत्ववान महिलांना येथे 'कमला पॉवर विमेन' पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            अभिनेत्री सुहास जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अंकीबाई घमंडीराम गोवानी ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. ट्रस्टच्या संस्थापिका निदर्शना गोवानी व रमेश गोवानी व्यासपीठावर उपस्थित होते.

            अंकीबाई घमंडीराम ट्रस्टच्या माध्यमातून निदर्शना गोवानी यांनी कोरोना काळात गरीब, महिला, कोविड योद्धे व उपेक्षितांची सेवा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना महिला हे शक्तीस्वरूप असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            भारतात स्त्रियांचा सन्मान करण्याची परंपरा वेदकाळापासून असल्याचे सांगताना त्यांनी गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, अरुंधती आदींच्या विद्वत्तेचा गौरव केला. देश पारतंत्र्यात असताना काही महिलाविरोधी अनिष्ट प्रथा रुढ झाल्या. परंतु आज महिला सर्व क्षेत्रांत पुढे जात आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी मुलींनी अलीकडेच माउंट एव्हरेस्ट देखील सर केले. देश संकटात असताना महिला पुन:श्च शक्तिरूपा होऊन मदतीला धावून येतील असे त्यांनी सांगितले. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी चेतना सिन्हा, स्मिता थोरात, श्वेताली ठाकरे, कीर्ती चिंतामणी, रंजना कोळगे, पूनम चोक्सी, एलिझाबेथ एफ कट्टूक्करेन, प्रतिभा सांगळे, डॉ.जया महेश, पूजा उदेशी, शक्ती मोहन, सिमा टपरिया, विद्या भांडे, भावना जैन, रेखीव खान, प्रभात खान, स्मिता थोरात, विनिता साहू, गीता व्यंकटेश्वर, अलिशा सिंग, नीती मोहन, फरजाना दोहाडवाला, डॉ. रिश्मा पै, अधिवक्ता गौरी छाब्रिया, झैनाब जाविद पटेल, सिस्टर बर्टिला, सिस्टर लुसिया, नीती गोयल, डॉ.महिमा बक्षी, डॉ ऋचा जैन, अनुपमा देवराजन, माधुरी मडावी, बिनाफर कोहली, श्वेता वर्धन, सुलोचना चव्हाण, मनीषा वाघमारे, दिया मिर्झा, पूनम गौरव बोरसे, संगिता दशरथ धनकुटे, समीरा गुजर यांना सन्मानित करण्यात आले.

0000

Governor Koshyari presents 'Kamala Power Women Award

2022' to 38 women achievers

            Mumbai, Dt. 8 :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 'Kamala Power Women Award 2022' to 38 women achievers from various walks of life at Raj Bhavan Mumbai on the occasion of International Women's Day on Tuesday (8 Mar)

            The felicitation of women achievers was organised by the Ankibai Ghamandiram Gowani Trust. Theatre and film actor Suhas Joshi was among those felicitated on the occasion.

            Founders of the Trust Nidarshana Gowani and Ramesh Gowani were present.

            The Governor felicitated Chetna Sinha, Smita Thorat, Shwetali Thakare, Kirti Chintamani, Ranjana Kolge, Poonam Choksi, Elizabeth F Kattookkaren, Pratibha Sangale, Dr. Jaya Mahesh, Pooja Udeshi, Shakti Mohan, Sima Taparia, Vidya Bhande, Bhawna Prakash, Rekha Khan, Jasmin Bhasin, Vinita Sahu, Geetha Venkateswar, Alisha Singh, Neeti Mohan, Farzana Dohadwala, Dr. Rishma Pai, Advocate Gauri Chhabria, Zainab Javid Patel, Sister Bertilia, Sister Lucia, Neeti Goel, Dr. Mahima Bakshi, Dr. Richa Jain, Anupama Devarajan, Madhuri Madavi, Binaifer Kohli, Shweta Vardhan, Sulochana Chavan, Manisha Waghmare, Poonam Gaurav Borse, Samira Gujar and Sangita Dashrath Dhankute on this occasion. Samira Gujar conducted the proceedings.

0000





 




 


Featured post

Lakshvedhi