Tuesday, 6 January 2026

कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही

 कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही

-         कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

नागपूर दि. ११ : राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाहीअसे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटीलसदाभाऊ खोतशशिकांत शिंदेनिरंजन डावखरेप्रविण दरेकरसंजय खोडके आणि कृपाल तुमाने यांनी सहभाग घेतला.

कृषी मंत्री.भरणे म्हणालेशेतकरी संकटात असताना शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. यापुढे शेतकऱ्याच्या हितासाठी शासन खंबीरपणे उभे राहील. मार्च पर्यंत कृषी योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi