Saturday, 24 January 2026

झरे हे स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पुनरूज्जीवन आणि संवर्धन करणे

 झरे हे स्वच्छसुरक्षित आणि शाश्वत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेतत्यामुळे त्यांचे पुनरूज्जीन आणि संवर्धन करणे गरजेचे असून शासनप्रशासनाबरोबर जनतेचीही ती सामूहिक जबाबदारी असल्याचे मत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी व्यक्त केले.

प्रशिक्षणार्थींना झऱ्याचा संपूर्ण प्रवास समजावा यासाठी सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यातील रानगेघर या गावातील तामकडा या झऱ्याचा ट्रान्झिट वॉक करण्यात आलायामध्ये झऱ्याच्या पाण्याच्या उगम बिंदूपासून ते खाली वाहणाऱ्या प्रवाहापर्यंतचा नैसर्गिक प्रवासपाणी जमिनीत मुरण्याची ठिकाणंपाण्याचा प्रवाह, मार्गझऱ्याची सध्यस्थितीआजूबाजूची भूगर्भीय व भौगोलिक माहिती, पाण्याची गुणवत्तास्प्रिंग बॉक्सपाणलोट विकासाची कामेमानवी हस्तक्षेप या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष भेट देन अभ्यास करण्यात आलायामध्ये ग्रामस्थांसोबत ॲक्वाडॅमचे मुकेश पाटीलमृत्युंजय विचारेग्रामपरीचे दिपक जाधवविकास जाधव यांनी तांत्रिक माहितीसह मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाची सुरुवात वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवेग्रामपरीच्या संचालक जयश्री राव  अर्चना राव यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. एक्वाडॅमच्या भूवैज्ञानिकांनी महाराष्ट्रातील नैसर्गिक झऱ्यांची ओळखनोंदणीसंरक्षणपुनर्जीवनपाण्याची सातत्यपूर्ण उपलब्धता तसेच लोकसहभागातून शाश्वत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

झऱ्यांचे व्यवस्थापन या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 50 मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात आलेमहाराष्ट्रामध्ये झऱ्यांचे धोरण राबविताना हे ट्रेनर्स दिशादर्शक म्हणून काम करतील.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi