Thursday, 8 January 2026

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार

 राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार काढून दिल्ली येथील संवाद कार्यक्रमासाठी निवड झालेल्या युवकांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल आचार्य देवव्रत युवकांशी संवाद साधताना म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला नवे स्वरूप देण्यात आले असून देशातील सर्व राज्यातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवड झालेल्या तीन हजार गुणवंत युवकांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. मेहनतपरिश्रम व गुणवत्तेच्या बळावर  या स्पर्धेसाठी निवड झालेल्या युवकांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कौतुक केले. ते म्हणालेया स्पर्धेसाठी झालेली युवकांची निवड ही विकसित राष्ट्र निर्माणातील त्यांच्या कष्टाच्या भूमिकेची पावती आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi