निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी ईसीआयनेटमुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढून निवडणूक संस्थांवरील विश्वास दृढ होईल, तसेच कार्यपद्धतीवर प्रभावी देखरेख, जलद निर्णयप्रक्रिया आणि माहितीचा वेगवान प्रसार शक्य होईल, असे नमूद केले. तर डॉ. विवेक जोशी यांनी या परिषदेमुळे तंत्रज्ञान आणि डिजिटल नवकल्पनांच्या वापराबाबत जागतिक सर्वोत्तम पद्धती जाणून घेण्याची संधी निवडणूक संस्थांना मिळणार असल्याचे सांगितले.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालक डॉ.सीमा खन्ना यांनी सादरीकरणात सायबर सुरक्षेला ईसीआयनेट मुख्य आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. आज तंत्रज्ञान केवळ सहाय्यक भूमिका बजावत नसून, ते धोरणात्मक सक्षमक बनले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ईसीआयनेट’मुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि जनतेचा विश्वास वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment