संकल्प एक - योगदान हजारोंचे
तहानभूक विसरुन, कुटुंबापासून दूर.. देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक हे ऊन, वारा पाऊस, थंडीत मृत्यूच्या छायेत दररोज झुंजतात.. ते केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर देशसेवेचे व्रत पाळण्यासाठी. देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये अमूल्य योगदान देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन. ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२५ सालासाठी ४० कोटी निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यासाठी आहे. चला तर मग.. सशस्त्र सेना ध्वज दिना निमित्त आपल्या सैनिकांना सलाम करुया.. ध्वज दिन निधीमध्ये आपला मोलाचा हातभार लावूया..!
000




No comments:
Post a Comment