डॉ. विजय कलंत्री म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशांतील व्यापार संबंधांना नवे बळ मिळाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला रशियन व्यापार प्रतिनिधींकडून सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात व्यापाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. भारतीय भांडवली बाजारातील रशियन गुंतवणूक, अणू व संरक्षण क्षेत्रातील अत्यावश्यक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रम यांमुळे २०२७ पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इरिना मलाहोवा म्हणाल्या, भारत आणि रशिया यांच्यात दीर्घकाळापासून दृढ आर्थिक व व्यापारी भागीदारी आहे. ही भागीदारी अधिक मजबूत करणे आणि रशियन उद्योगांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश सुलभ करून देणे तसेच निर्यात प्रोत्साहन व व्यवसाय संधी देणे हा परिषदेचा मुख्य उद्देश असून रशिया आणि भारत यांच्यात फलदायी द्विपक्षीय संबंध निर्माण होतील. त्यांनी यावेळी रशियातील व्यापार व निर्यात संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment