मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले, राज्यात औद्योगिक अपघात होण्याचे प्रमाण लक्षात घेता कामगार विभागातील अधिकारी संख्या कमी असली तरी सीएसआय प्रणालीद्वारे कामगार विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्येगिक विकास महामंडळ यांच्यावतीने संयुक्त तपासण्या होत आहेत.
मागील चर्चेनंतर शासनाने 2 हजार 230 धोकादायक कारखान्यांची तपासणी केली आहे. त्यापैकी 469 कारखान्यांकडे नियमांचे पालन नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. तसेच सुरक्षित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालघर महाराष्ट्र औद्येगिक विकास महामंडळ वसाहत व परिसरातील सर्व उद्योगांचे विस्तृत परीक्षण, नियमभंग आढळल्यास तातडीने दंडात्मक कारवाई, कामगार विभागातील अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याची प्रक्रिया, लवकरच राज्यव्यापी विशेष सुरक्षा मोहीम सुरू करण्यात येणार आहे, असेही कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment