वासनीसह तीन प्रलंबित धरण प्रकल्प मार्गी लावणार
– जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नागपूर, दि.१३ : अमरावती जिल्ह्यातील वासनी धरणासह परिसरातील तीन धरण प्रकल्पांबाबतची कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य प्रवीण तायडे यांनी यासंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न मांडला, त्यास मंत्री महाजन यांनी उत्तर दिले.
जलसंपदा मंत्री महाजन यांनी माहिती देताना सांगितले की, वासनी प्रकल्पाला 2008 मध्ये 102 कोटी 81 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर भूस्तर वर्गीकरण , सांडव्याचे संकल्पन इत्यादी बाबींमुळे या निविदेची किंमत 195.38 कोटी झाली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कंत्राटदाराकडून 25.46 कोटी रुपयांची वसुली करण्याचा आदेश असल्याचेही जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले. संबंधित ठेकेदाराकडे सुरू असलेल्या इतर कामांतून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला असून, सर्व वसुली पूर्ण करून प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार आहे.
राजना बॅरेज प्रकल्पाबाबत बोलताना जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले की, हा देखील अत्यंत जुना प्रकल्प असून त्याला 64 कोटी 69 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता होती. प्रकल्पावर मूळ प्रशासकीय मान्यतेनंतर काहीही खर्च झाला नाही. आता लेआउट, माती, दरवाजे आदी बाबींची नव्याने तपासणी करून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
वासनीसह तीनही धरण प्रकल्प गेल्या 2008 पासून, प्रलंबित असून विदर्भ विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न अंतिमतः मार्गी लावण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री महाजन यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment