Monday, 3 November 2025

आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे

 या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणेत्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. या वेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणीतसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले. यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकतानेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झालाअशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi