‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मंत्रालयात निनादणार समूहगान
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्ध शताब्दी महोत्सवाला होणार सुरुवात
· मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रम
मुंबई, दि. ६ : स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता 'वंदे मातरम् ' चे समूहगान होणार आहे. पुढील वर्षभर याअंतर्गत सार्ध शताब्दी महोत्सवाच्या माध्यमाने राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
No comments:
Post a Comment