Saturday, 25 October 2025

हवामान बदल संकटावर 'नैसर्गिक शेती' हाच उपाय

 हवामान बदल संकटावर 'नैसर्गिक शेतीहाच उपाय

- राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. २४ : नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्यपाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करण्याची ही पध्दती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

             राजभवन येथे नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल आचार्य देवव्रत बोलत होते. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेयांच्यासह खासदारमंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi