Friday, 10 October 2025

स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ

 स्पष्ट दृष्टिकोनजलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी

महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ९ : राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत स्पष्ट दृष्टिकोनजलद निर्णयप्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी हे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ आहेतअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित "ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५च्या कार्यक्रमामध्ये क्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारखे विविध प्रकल्प अनेक दशके प्रलंबित होतेपरंतु इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रूमच्या माध्यमातून निर्णयप्रक्रिया गतिमान करण्यात आली. पूर्वी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केवळ नियोजनासाठी सहा वर्षे लागली होती. मात्र आम्ही ३७२ किमी मेट्रो नेटवर्कसाठी केवळ ११ महिन्यांत निविदा टप्प्यापर्यंत पोहोचलो.

सन २०३० पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी एमएमआर ग्रोथ हब इनिशिएटिव्हच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi