संकट व्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण
नैसर्गिक आपत्ती असो, सामाजिक अशांतता असो किंवा महामारी, अखिल भारतीय सेवांचे अधिकारी धोरणे आणि योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत सातत्य, समन्वय आणि नेतृत्व प्रदान करतात. केंद्राच्या धोरणांना स्थानिक वास्तवाशी सुसंगत ठेवण्याची त्यांची क्षमता भारताला अंतर्गत आव्हानांचा सामना करण्यास आणि विविधतेत एकता टिकवण्यास सक्षम करते. आसाममधील पुरापासून गुजरातमधील भूकंपापर्यंत, संकट काळातील त्यांचे नेतृत्व समुदायांना स्थिर ठेवते आणि आवश्यक सेवांची सातत्याने पूर्तता सुनिश्चित करते.
No comments:
Post a Comment