Friday, 19 September 2025

अतिवृष्टीमुळे नुकसान; राज्य सरकार तात्काळ मदत देणार

 अतिवृष्टीमुळे नुकसान;  राज्य सरकार तात्काळ मदत देणार

अतिवृष्टीमध्ये दगावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी किंवा गावकरी त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ करायचा आहेयासाठी कृष्णा खोऱ्यातले  पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणले. दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचे पुराचे पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आणण्यात येणार आहे.  उल्हास खोऱ्याचे ५४ टीएमसी पाणीदेखील मराठवाड्यामध्ये आणण्यात येईल. गोदावरीच्या खोऱ्यातील तूट दूर करून यासंदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचे  काम निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून केले  जाईल. डिसेंबरपर्यंतचा डीपीआर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी- फेब्रुवारी मध्ये याची निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi