सुपोषित राज्य करण्यासाठी अंगणवाडी महिलांचा मोठा सहभाग असून, यासाठी १८ हजार पदांची भरती करण्यात आली आहे. मातृवंदना योजना राबविण्यातही राज्य आघाडीवर असून, ६३ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्याच्या निरोगी व उज्वल भविष्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. सेविका आणि मदतनीस या पोषण आहाराच्या आधारस्तंभ असून, गावोगावी, घराघरात पोषण, आरोग्य आणि शिक्षण यांचा संदेश पोहोचविण्याचे काम त्या करीत आहेत.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पोषण भी पढाई भी’, अर्भक व बालक आहार पद्धती, शिक्षण, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणारे रेशन, बेबी किट, सुपोषित ग्राम पंचायत योजना, पोषण अभियान अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरजू महिलांना लाभ देण्यात येत आहे. तसेच त्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे.
पोषण महा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट सेविका, मदतनीस व अंगवाडी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment