स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार – कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, नव्या धोरणांतर्गत मुख्यमंत्री उद्योजकता व नाविन्यता महाफंड उभारण्यात येईल. शासनाकडे नोंद असलेल्या ३० लाख तंत्रशिक्षित युवक-युवतींना ईमेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी केले जाईल. त्यातून पाच लाख उमेदवारांची निवड होईल. पुढील चाळणीनंतर १ लाख उमेदवारांना स्पर्धा, हॅकेथॉन व चाचण्यांतून संधी दिली जाईल. अंतिम टप्प्यात २५ हजार निवडक उमेदवारांना तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत व प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक व स्टार्टअप्स घडविण्याचे उद्दिष्ट आहे.
महिला सक्षमीकरणासाठी महिला-केंद्रित इनक्यूबेटर, विशेष आर्थिक मदत, तसेच लेदर इन्स्टिट्यूट, वांद्रे येथे “मिशन इनोव्हेशन २०४७” या नावाने जागतिक दर्जाचे केंद्र स्थापन होणार आहे. तसेच ग्लोबल महाराष्ट्र इनोव्हेशन समिट आयोजित करून प्रमुख २० जागतिक प्रवर्गांसोबत भागीदारी करीत ₹५०,००० कोटींच्या थेट परदेशी गुंतवणुकीचे (FDI) उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment