Friday, 5 September 2025

नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना हिरवा झेंडा

  

नाफेडच्या माध्यमातून तांदूळपीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना हिरवा झेंडा

----

ग्राहकांच्या सोयीसाठी सहकारी ग्राहक भांडारच्या माध्यमातून विक्रीचा प्रयत्न

-पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. 4 :  केंद्र सरकारच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून भारत’ ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली भारत’ आटा (गव्हाचे पीठ)तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातीलअसे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

परवडणाऱ्या किमतीत आवश्यक आणि दर्जेदार अन्नपदार्थांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने भारत’ ब्रँड उत्पादनांची विक्री केली जात आहे. याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. यावेळी नाफेडच्या वतीने राज्य प्रमुख भव्या आनंद उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi