सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाचा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण
· पुणेकरांना गणेशोत्सवाची भेट
· तीन टप्प्यात कोटी ११८.३७ रूपये निधीतून उभा राहिला उड्डाणपूल
· तीस मिनिटाचा वाहतूक कालावधी आला केवळ सहा मिनिटावर
पुणे, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : पुणे शहरातील वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्यातला अडीच किलोमीटरचा पुल हा अत्यंत महत्वाचा असून या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून तर सुटका होणारच आहे. याबरोबरच प्रदूषण कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी ही भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाच्या लोकार्पणानंतर सांगितले.
सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
No comments:
Post a Comment