उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर व मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी ग्रामीण महिलांच्या कष्टाचे कौतुक करत हे यश महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देईल असा विश्वास व्यक्त केला.
सियाल इंडिया 2025 मधील या यशामुळे ग्रामीण महिलांना जागतिक बाजारपेठेत प्रवेशाचे दार खुले झाले आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारामुळे ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या उत्पादनांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कायमस्वरूपी दालन उपलब्ध झाले आहे. त्यांची उत्पादने महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे प्रतिनिधित्व करत आहेत. हे यश महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरले आहे.
‘उमेद’ अभियानाच्या उत्पादनांची मोठी रेंज
या प्रदर्शनात ‘उमेद’ अभियानाने १७ प्रकारची उत्पादने सादर केली आहेत, जी वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार आहेत.
* माढा येथील डाळिंब, केळी, शेवगा
* नाशिकचा प्रसिद्ध लाल कांदा
* धाराशिवचे न्यूट्री शेवया
* वायगावची भौगोलिक निर्देशांक (GI) प्राप्त हळद
* देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूस आंबा
* साताराचे मिलेट कुकीज
* सोलापूरची मालदांडी ज्वारी
* प्रसिद्ध इंद्रायणी आणि चिनूर तांदूळ
* चारू तूरडाळ
* साताराचे घाण्यावरचे तेल (कोल्ड प्रेस ऑइल)
* बाजरी, नाचणी आणि मिरची यांसारखी इतर अनेक उत्पादने आहेत.
No comments:
Post a Comment