नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू; उणे प्राधिकार पत्रावर
मदतीचा निधी आहरीत करण्यास मान्यता
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
मुंबई, दि. १८ :- राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू, झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी, जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment