Thursday, 17 July 2025

वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल

 वाढवण बंदरामुळे भारताची सागरी महासत्तेकडे वाटचाल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • सागरी शिखर परिषद २०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईदि. १६ : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असूनहा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने आयोजित सागरी शिखर परिषद २०२५ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेपरिवहन व बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेउद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगनमहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीचे अध्यक्ष उमेश वाघ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi